साक्षी महाराज यांच्या पावलावर पाऊल ठेवत आता साध्वी प्राची यांनीही पुन्हा एकदा ‘हम दो हमारे चार’ असा नारा दिला आहे.
नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वारंवार समज देऊनही भाजपा खासदारांची मुक्ताफळे उधळणे सुरुच आहेत. साक्षी महाराज यांच्या पावलावर पाऊल ठेवत आता साध्वी प्राची यांनीही पुन्हा एकदा ‘हम दो हमारे चार’ असा नारा दिला आहे.
भिलवारा येथे झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वादग्रस्त विधान केले. आपल्याकडे प्रत्येक कुटुंबात चार मुले असणे गरजेचे आहे. एक मुलगा देशासाठी सीमेवर लढेल, दुस-याला संताकडे सोपवले पाहिजे, तिसरा समाजकार्य करेल आणि चौथा संस्कृतीचे रक्षण करेल असे प्राची म्हणाल्या.
काही दिवसांपूर्वीच खासदार साक्षी महाराज यांनी हिंदुंनी कमीत कमी चार मुलांना जन्म द्यावा असे वादग्रस्त विधान केले होते. यावरुन त्यांच्यावर जोरदार टीका झाली होती. भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी मात्र सारवासारव करत हे मत वैयक्तिक साक्षी महाराजांचे असून पक्षाचे नाही असे म्हटले होते.