‘अंनिस’चे डॉ. नरेंद्र दाभोलकर व कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या मारेक-यांना पकडण्यात सरकार अपयशी ठरले आहे.
मुंबई- ‘अंनिस’चे डॉ. नरेंद्र दाभोलकर व कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या मारेक-यांना पकडण्यात सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे मारेक-यांनी स्वत:च शरणागती पत्कारावी, या आशयाचे पत्र सर्वसामान्य नागरिकांनी मारेक-यांना लिहिले आहे.
‘महाराष्ट्र समिती’तर्फे आझाद मैदानात २७ मार्चला सकाळी ११ वाजता आयोजित कार्यक्रमात या पत्राचे जाहीर वाचन करण्यात येणार आहे. दाभोलकर व कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या मारेक-यांना पकडण्यात सरकार स्पशेल अपयशी ठरले आहे.
आता सरकारची लाज राखण्यासाठी मारेक-यांनीच स्वत: मोठय़ा मनाने शरण यावे. तुमच्या या कौशल्याबद्दल तुमचा ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कारा’ने सत्कार करावा, अशी विनंती आम्ही सरकाला करू, असे उपरोधिक टीकाही या पत्रांतून करण्यात आली आहे.