दिल्लीत १ जानेवारीपासून सम क्रमांकाची वाहने सम तारखेस व विषम क्रमांकाची वाहने विषम तारखेस रस्त्यावर आणण्याची योजना लागू करण्यात येत आहे.
नवी दिल्ली- दिल्लीत १ जानेवारीपासून सम क्रमांकाची वाहने सम तारखेस व विषम क्रमांकाची वाहने विषम तारखेस रस्त्यावर आणण्याची योजना लागू करण्यात येत आहे.
परंतु ही योजना १५ जानेवारीच्या पुढे कोणत्याही परिस्थितीत राबवली जाणार नाही, असे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितले.
जेव्हा प्रदूषणाची पातळी धोकादायक स्तरावर जाते, तेव्हा बहुतेक देश अशी योजना राबवतात. १५ दिवसांनंतर आम्ही या योजनेचा आढावा घेऊ. दिल्लीकरांनी ही योजना स्वीकारली तर आम्ही कायमस्वरूपी उपाय म्हणून विचार करू, असे ते म्हणाले.
मुख्यमंत्री वगळून उर्वरित अतिमहत्त्वाच्या व्यक्ती, पोलीस किंवा अग्निशमन दलाच्या गाडय़ा आणि महिला चालवत असलेली वाहने यांनाच योजनेतून सूट मिळेल, असेही केजरीवाल म्हणाले.