वादग्रस्त, असंवेदनशील विधाने करणारे केंद्रीय मंत्री व्ही.के.सिंह आणि किरेन रिजीजू यांना भाजपाचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी जाहीर विधाने करताना खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे.
नवी दिल्ली – वादग्रस्त, असंवेदनशील विधाने करणारे केंद्रीय मंत्री व्ही.के.सिंह आणि किरेन रिजीजू यांना भाजपाचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी जाहीर विधाने करताना खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे.
व्ही.के.सिंह आणि रिजीजू यांनी आपल्या विधानाबद्दल स्पष्टीकरण दिले असले तरी, मला असे वाटते की, आम्ही सर्व सत्ताधारी पक्षाचे लोक आहोत. लोकांप्रती आमच्या काही जबाबदा-या आहेत. त्यामुळे आपले विचार व्यक्त करताना विधाने करताना आम्ही जास्त काळजी घेतली पाहिजे असे राजनाथ म्हणाले.
आमच्या विधानाचा चुकीचा अर्थ काढला असे सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी म्हणू नये. त्यांचे शब्द सुरुवातीपासूनच अचूक असले पाहिजेत असे सिंह म्हणाले.
आपण सरकारमध्ये आहोत. लोकांना आपल्याकडून अपेक्षा आहेत याची संबंधितांनी काळजी घेतली पाहिजे असे राजनाथ म्हणाले. माजी लष्करप्रमुख राहिलेल्या व्ही.के.सिंह यांनी फरीदाबादमध्ये झालेल्या दलित हत्याकांडासंबंधी आक्षेपार्ह विधान केले होते. नियम मोडण्याचा उत्तर भारतीयांना अभिमान वाटतो असे वादग्रस्त विधान रिजीजू यांनी केले होते.