भारतात प्रति दिवशी ३८० लोकांचा रस्ते अपघातात मृत्यू होतो. या वर्षभरात साधारणत: एक लाख लोकांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. हे अपघात टाळण्यासाटी देशभरातील न्यूरोलॉजिस्ट संघटित झाले असून, त्यांच्याद्वारे राबवण्यात येणा-या मोहिमेत महानायक अमिताभ बच्चन आणि क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर हेल्मेटबाबत जनजागृती करणार आहेत.
मुंबई – भारतात प्रति दिवशी ३८० लोकांचा रस्ते अपघातात मृत्यू होतो. या वर्षभरात साधारणत: एक लाख लोकांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. हे अपघात टाळण्यासाटी देशभरातील न्यूरोलॉजिस्ट संघटित झाले असून, त्यांच्याद्वारे राबवण्यात येणा-या मोहिमेत महानायक अमिताभ बच्चन आणि क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर हेल्मेटबाबत जनजागृती करणार आहेत.
‘न्यूरोलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया’ची ६२वी वार्षिक परिषद ११ डिसेंबर रोजी मुंबईतील एनसीपीए येथे होत आहे. या परिषदेत ‘एचईडीएस (हेड्स) वुई विन!’ या मोहिमेचा शुभारंभ होणार आहे. हेल्मेट घालणे आपल्या व इतरांच्या सुरक्षेकरता किती महत्त्वाचे आहे, याबाबत या मोहिमेतून जनजागृती करणार असल्याचे केईएम रुग्णालयाचे न्यूरोसर्जन डॉ. दत्तात्रय मुझुमदार यांनी सांगितले.
अपघातात डोक्याला दुखापत झालेल्या रुग्णाला तासाभरात रुग्णालयात आणल्यास त्याचे प्राण वाचू शकतात, परंतु भारतात रुग्णवाहिका सेवा, डॉक्टर, प्रशिक्षित कर्मचारी यांच्यासह वैद्यकीय केंद्रांची वानवा आहे. परिणामी जखमींना वेळेत उपचार मिळत नसल्याने त्यांचा मृत्यू होतो. काही वेळेला रुग्णाला कायमचे अपंगत्वही येते. त्यामुळे अपघातातील जखमींना मदत करावी, असेही मत डॉ. मुझुमदार यांनी व्यक्त केले. आम्ही राबवत असलेल्या मोहिमेत महानायक अमिताभ बच्चन आणि क्रिक्रेटपटू सचिन तेंडुलकर हेल्मेटबाबत जनजागृती करणार आहेत.
या दोघांची १० मिनिटांची मार्गदर्शनफर चित्रफीत बनवण्यात आली आहे. ही चित्रफीत सर्वत्र दाखवण्यात येणार असल्याचे माहिती बॉम्बे न्यूरोसायन्स असोसिएशनच्या डॉ. स्मिता शर्मा यांनी दिली.
रस्ते अपघातांत मृतांत २० ते ४० वयोगटातील तरुणांची संख्या अधिक
डोक्याला गंभीर इजा लागून सहा नागरिकांपैकी एकाचा मृत्यू होतो. अमेरिकेत हे प्रमाण २०० नागरिकांमागे एक असे आहे. १९८० मध्ये रस्ते अपघात २४,६०० जणांचा मृत्यू झाला. तर २०१२ मध्ये एक लाख ४० हजार लोकांना रस्ते अपघातात आपले प्राण गमवावे लागले आहेत. मृतांत २० ते ४० वयोगटातील तरुणांची संख्या अधिक होती.