कोळसा खाण वाटपावरून विरोधी पक्षांनी केलेल्या गोंधळामुळे संसदेचे कामकाज सोमवारी पुन्हा दिवसभऱासाठी तहकूब करावे लागले.
नवी दिल्ली- कोळसा खाण वाटपावरून विरोधी पक्षांनी केलेल्या गोंधळामुळे संसदेचे कामकाज सोमवारी पुन्हा दिवसभऱासाठी तहकूब करावे लागले. या प्रकरणावरून कामकाज तहकूब होण्याचा सोमवारचा पाचवा दिवस आहे.
सकाळी कामकाज सुरू होताच, पंतप्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून भाजपासह विरोधी पक्षांनी केलेल्या गोंधळामुळे कामकाज दुपारी बारापर्यंत तहकूब केले. त्यानंतर पंतप्रधानांनी खाण वितरणाप्रकरणी निवेदन करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यालाही भाजपाने विरोध करत जोरदार गोंधळ घातला. त्यामुळे पंतप्रधांनांनी आपले निवेदन दोन्ही सदनांच्या पटलावर ठेवले.
त्यानंतर दुपारी दोन वाजता पुन्हा कामकाज सुरू होताच, विरोधकांनी पुन्हा गोंधळाला सुरुवात केली. त्यामुळे लोकसभा व राज्यसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.