संजय दत्तला १४ दिवसांची संचित रजा मंजूर झाली असून तो आज तुरुंगाबाहेर आला आहे.
पुणे – १९९३मधील मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या संजय दत्तला १४ दिवसांची संचित रजा मंजूर झाली असून संजय आज तुरुंगाबाहेर आला आहे. आपल्या कुटुंबियांना भेटण्यासाठी संजय मुंबईच्या दिशेने रवाना झाला आहे.
१९९३मध्ये मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोट दरम्यान बेकायदा शस्त्रे बाळगल्या प्रकरणी न्यायालयाने संजय दत्तला पाच वर्षाची शिक्षा सुनावली होती.
संजय दत्तने चार डिसेंबर रोजी तुरुंग प्रशासनाकडे संचित रजेसाठी अर्ज दाखल केला होता. अखेर मंगळवारी त्याची रजा मंजूर करण्यात आली.
याआधीही गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये वैद्यकीय उपचारासाठी १४ दिवसांच्या रजेवर गेला होता. त्यानंतर त्याची रजा आणखी १४ दिवसांनी वाढवण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा पत्नी मान्यताच्या आजारपणामुळे त्याला महिन्याभराची रजा मंजूर करण्यात आली होती.