१९८४ साली झालेल्या शीखविरोधी दंगल संदर्भातील चौकशीसाठी विशेष तपास पथक नेमण्यात यावे अशी मागणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे
नवी दिल्ली – माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या मृत्यूनंतर दिल्लीत उसळलेल्या शीखविरोधी दंगलीच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक नेमण्यात यावे अशी मागणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. बुधवारी केजरीवाल यांनी नायब राज्यपाल नजीब जंग यांची भेट घेतली आणि विशेष पथक नेमण्यात यावे अशी मागणी केली.
दिल्ली निवडणुकीदरम्यान अरविंद केजरीवाल यांनी दिलेल्या जाहीरनाम्यामध्ये या आश्वासनाचाही समावेश होता. तसेच विधानसभा निवडणुकीत शीख नागरिकांनी मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला होता.
दोन दिवसांपूर्वी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी एका मुलाखतीत १९८४साली शीखविरोधी दंगल थांबवण्याचा प्रयत्न काँग्रेस सरकारने केला असे म्हटले होते. त्यांच्या या विधानानंतर दोन दिवसांतच अरविंद केजरीवाल यांनी राज्यपालांकडे ही मागणी केली.
३१ ऑक्टोबर १९८४ मध्ये इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर शीख विरोधात मोठी दंगल झाली होती. यामध्ये अनेक शीख नागरिक मृत्यूमुखी पडले होते.