नवरात्र जवळ आली की, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारक-यांना वेध लागतात ते श्री दुगार्माता दौडीचे. अश्विन शुक्ल प्रतिपदा म्हणजे घटस्थापना ते विजयादशमी – दस-यापर्यंत पहाटे उठून राष्ट्रभक्तीपर गीतं म्हणत गावातल्या प्रत्येक वाटेने सर्व गावक-यांना घेऊन दौडत जायचं आणि पदर पसरवून देवीकडे एक मागणं मागायचं. भारतमातेचा उद्ध्वस्त झालेला संसार पूर्ववत होण्यासाठी तिचं गतवैभव पुनस्र्थापित होण्यासाठी जी दौड करायची, तिचं नाव श्री दुर्गामाता दौड.
आतुर धावत आलो, तव दर्शनाला
शिवबा समान मति, हृदय द्युती दे आम्हाला
शिवतेज ठासून भरू, जनशोणितांत
करू हिंदुराष्ट्र बलदंड उभ्या जगांत
देवीकडे मागितलेलं हे मागणं म्हणजे स्वत: चा संसार आणि घरादारासाठी नसून देशाचा उद्धस्त झालेला संसार पुनर्प्रस्थापित होण्यासाठीच मागणं आहे. असे सलग ९ दिवस साकडं घालण्याचा हा उपक्रम. गेले ३० वर्षापासून श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रातल्या हजारो खेडय़ापाडय़ांमध्ये हा उपक्रम श्री दुर्गामाता दौड या नावे केला जातो.
अलीकडे पाच वर्षामध्ये मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे येथेसुद्धा मोठय़ा संख्येने दौड काढली जाते. महाराष्ट्रातील धारक-यांनी सुरू केलेली दौड पाहून देव देश धर्मासाठी नि:स्वार्थ भावाने महाराष्ट्रच नव्हे तर राजस्थानमधील गावे कर्नाटकातील उडपी तसेच महाराष्ट्र आणि कर्नाटक असा सीमावाद असलेला बेळगावसुद्धा दौडीचे नियोजन करतो. बेळगावमधल्या श्री दुगार्माता दौडीचे महत्त्व म्हणजे या दौडीचे नेतृत्व मुलींकडे देण्यात येतं. भगवा ध्वज आणि शस्त्र घेऊन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या रणरागिनी धावतात. या ठिकाणी बेळगावकर हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून देवीकडे मागणं मागतात.
दौडीमागचे ऐतिहासिक कारण
श्री दुगार्माता दौडीचा प्रारंभ श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजीराव भिडे गुरुजींनी केला. यामागचे ऐतिहासिक कारण म्हणजे श्री शिवछत्रपतींच्या जन्माआधी देशावर पारतंत्र्याचा अंध:कार दर दिवशी अति दाट होत चालला होता. परंतु हिंदु क्षुद्र होऊन ते लाचार जीवन पत्करत होता. अशा वेळी अशा सातशे वर्षाच्या पारंतत्र्यात असलेल्या भीषण काळरात्री श्री शिवनेरीवर श्री शिवछत्रपतींच्या रूपाने पुण्योक जिजाऊंच्या पोटी जन्माला आले. अशा अन्यायी, अत्याचारी काळात शिवबा पोटी असताना प्रतिवर्षाप्रमाणे जिजामातेने नवरात्रीत घट बसवले. पण त्यांनी काय मागितले? तर आपला संसारासाठी नव्हे, भोसले घराण्यासाठी नव्हे तर कन्याकुमारी ते काश्मीर ब्रम्हदेश ते बलुचिस्तान पसरलेला भारतमातेचा उद्ध्वस्त झालेला संसार दुरुस्त करण्यासाठी आशीर्वाद दे. हे मागणे स्वत: साठी नसून समस्त हिंदू समाजासाठी होते.
तरुण पिढीच्या नसानसांत स्वातंत्र्यभक्ती बिंबवण्याचा शिवमार्ग..
“श्री दुगार्माता दौड” ही रूढी जर कोणी सुरू केली असेल तर ती पुण्योक जिजाबाई साहेबांनी. शिवराय गर्भात असताना आलेल्या नवरात्रात त्यांनी त्या नवरात्रात भोसले कुळासाठी नाही तर काश्मीर ते कन्याकुमारी व ब्रह्मदेश ते बलुचिस्तान उभ्या आडव्या पसरलेल्या हिंदुस्थानच्या उज्ज्वल भवितव्यासाठी जे मागणं मागितलं. त्याचा प्रसाद म्हणजे श्री शिवप्रभू. आपणही हाच अति उदात्त भाव अंत:करणात धारण करून प्रतिवर्षी नवरात्रात श्री दुर्गामातेच्या पायाशी भारतमातेच्या उद्ध्वस्त होत चाललेल्या संसाराला दुरुस्त करण्याचा आशीर्वाद मागण्यासाठी दौडत जाणे म्हणजेच हे “राष्ट्रीय नवरात्र-श्री दुर्गामाता दौड”. श्री दुगार्माता दौडीची प्रथा जेथे जेथे सूर्य उगवतो त्या प्रत्येक गावी होणे अत्यंत अत्यावश्यक आहे. हा अतिउदात्त, स्फुर्तीप्रेरणादायक व उगवत्या तरुण पिढीच्या नसानसांत देशभक्ती, धर्मभक्ती, स्वातंत्र्यभक्ती मनावर बिंबवण्याचा राजमार्गच आहे.. शिवमार्गच आहे.. तो आपण पत्करला पाहिजे.
– गुरुवर्य संभाजीराव भिडे
देश कल्याणासाठीचा महामंत्र
श्री दुगार्माता दौड ही गुरुवर्याच्या मार्गदर्शनाखाली सुरू होते. हा काही साधासुधा उपक्रम नसून देश उद्धारासाठी देश कल्याणासाठी असलेला महामंत्र आहे. संपूर्ण देश हा श्री शिवाजी महाराज अन् श्री संभाजी महाराज रक्तगटाचा व्हावा यासाठी संपूर्ण देशभरातील तरुणांनी आपल्यासाठी नव्हे तर देव देश धमार्साठी नि:स्वार्थ भक्तिभावाने सहभागी व्हावे.
– भरत माळी, धारकरी प्रमुख, नवी मुंबई
देवीची आराधना करायची..
आपण ज्याप्रमाणे देवीची भक्ती करतो त्याचप्रमाणे श्री दुगार्माता दौड ही देवीची आराधना आहे. जिजाऊंनी देवीकडे काय मागणं मागितलं असेल, ज्यामुळे त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांसारखा पुत्र लाभला. तरुणांना इतकंच सांगेन की मोठय़ा संख्येने सहभागी व्हा. आपल्यामध्ये जो काही महाराजांचा अंश आहे तो जागृत होण्याची ताकद या उपक्रमातून मिळेल.
– अनंत करमुसे, जिल्हाप्रमुख धारकरी, ठाणे
श्री दुर्गामाता दौडीचे नियोजन
श्री शिवछत्रपती गर्भात असताना, पुण्योक जिजाऊंनी मागणं मागितलं आणि हे मागणं भवानी मातेने श्री शिवछत्रपतींच्या रूपानं पूर्ण केले. मग दौडच का तर श्री छत्रपती आपल्या आयुष्यात प्रचंड जहांगिरी असतानाही मुघलांविरुद्ध आयुष्याच्या शेवटपर्यंत अविरत लढले, झगडले, दौडले म्हणून ही दौड. नवरात्रीत प्रत्येक दिवशी पहाटे उठून ठरलेल्या ठिकाणी तरुणांनी जमायचे. प्रत्येकाने डोक्यावर वारकरी टोपी किंवा भगवा फेटा घालणे हा आवश्यक. बोडक्या डोक्याने दौड काढायची नाही. ज्या ठिकाणी देवीची स्थापना असेल तिथून दौडीला प्रारंभ होतो. एक धारकरी परमपवित्र दोन पताकांचा श्री भगवा ध्वज हातात धरून, त्यामागे पारंपरिक शस्त्र घेऊन शस्त्र पथक घेऊन प्रेरणामंत्र म्हणून दौडीला प्रारंभ करायचा. त्यानंतर श्री जगदंबेचा, श्री भवानी मातेचा, श्री शिवराय आणि हिंदू धमार्चा जयजयकार करत, राष्ट्रभक्तिपर गीत म्हणत नवरात्रोस्तव मंडळांना भेटी द्यायच्या. शेवटी प्रारंभ ठिकाणी येऊन देवीची आरती करून ध्येयमंत्राने दौडीची सांगता करावी.
अशाप्रकारे संभाजीराव भिडे गुरुजींच्या शब्दाला प्रमाण समजून श्री शिवाजी महाराज आणि श्री संभाजी महाराजांना स्मरून लाखो धारकरी दौडीत सहभागी होतात. जणू ‘देशासाठी जगायचं रं, शिवबान सांगावा धाडलाय रं’ असे म्हणत आपण ही पुण्योक जिजामातांचा व श्री शिवछत्रपतींचा तोच उदात्त भाव अंत:करणात धारण करून, प्रत्येक नवरात्रात दुगार्मातेच्या पायाशी सा-या भारतमातेचा उद्ध्वस्त होत चाललेल्या संसाराला दुरुस्त करण्यासाठी आशीर्वाद मागण्याची प्रथा पत्करली पाहिजे. असे आव्हान श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान श्री दुर्गामाता दौडीच्या रूपात करत आहेत.
तरुणांना दिलेली संजीवनीच
२२ वर्षाआधी माझ्या जीवनात श्री दुर्गामाता दौडीचा संबध आला. तेव्हाच छ. शिवाजी महाराज माझ्याशी आपोआप जोडले गेले. श्री दुर्गामाता दौड ही गुरुजींनी तरुणांना दिलेली संजीवनीच आहे. ज्याप्रमाणे शरीरासाठी जीवनसत्त्व महत्त्वाचं असतं, त्याच प्रमाणे देव, देश, धर्मासाठी जीवनसत्त्व देण्याचा मार्ग म्हणजे श्री दुर्गामाता दौड. तरुणांनी देशासाठी यामध्ये सहभागी होऊन नि:स्वार्थ मागणं मागा नक्कीच भविष्यातील देशावरील संकटांवर मात करायला आपल्याला उर्जा मिळेल.
– अविनाश मरकळ, धारकरी, पुणे
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान मुंबई विभागातर्फे गेले ५ वर्षे श्री दुर्गामाता दौड संपूर्ण मुंबईत काढली जाते. मुंबईतील प्रत्येक विभागातून दुर्गामाता दौडीच्या माध्यमातून देव देश आणि धर्मासाठी पुण्योक छत्रपती श्री शिवाजी महाराज व धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या ‘हिंदवी स्वराज्याच्या स्वप्नपूर्तीकरिता, आई जगदंबेच्या-दुगार्मातेच्या चरणी साकडे घालण्यासाठी शेकडोंच्या संख्येने तरुण या दौडीत सामील होत असतात. सर्व हिंदूधर्माभिमानी बांधवांनी दुर्गामाता दौडित सहभाग घ्यावा, असे आवाहन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान – मुंबई यांच्यावतीने करण्यात आले आहे.
– मंगेश केनी, धारकरी, मुंबई
नवरात्र आणि तरुणाईचा उत्साह याचं एक सेलिब्रेटी समीकरण आहे.. या काळात अनेकविध ट्रेंण्ड समोर येतात.. फक्त दांडियाच नाही तर अनेक उपक्रमांनी नवरात्री सेलिब्रेशनकरता तरुणाई
सज्ज असते..
हटके लुकसाठी तयारी आधी..
नवरात्र म्हणजे मुलींना नटण्याचा सजण्याचा सण. नवरात्रीचे ९ दिवस ९ वेगवेगळ्या रंगाचे कपडे परिधान करण्याचा ट्रेण्ड आपल्याला दिसतो. मी हे रंग दर वर्षी फॉलो करते. नवरात्र सुरू होण्याआधीच या रंगांचे कपडे आपल्याकडे आहेत की नाही हे पाहणं आणि नसतील तर खरेदी करणं ही सगळ्यात पहिली तयारी असते. तर गरबा म्हणजे माझा जीव की प्राण! वेगवेगळ्या मोठय़ा नवरात्र मंडळांचे पासेस मिळतात का याचा मी दर वर्षी शोध घेते आणि मिळाल्यास तिथे जाते सुद्धा! हे ९ दिवस आपला गरबा, वेशभूषा आणि एकूणच आपला लुक हटके असावा यासाठी मी जास्तीत जास्त तयारी करते.
– श्रद्धा भरत शेवाळे, ठाणे
दुस-यांदा खेळणार रासदांडिया..
ठाण्यामधील रघुनाथनगर येथील रास दांडिया या संपूर्ण ठाणे नगरीत प्रसिद्ध आहे. या ठिकाणीच आम्ही सर्व कॉलेजमधील मित्रमैत्रिणी गरबा, रास दांडिया खेळायला जातो. मध्यंतरी काही कारणामुळे माझं खेळायला जाणं बंद झालं होतं, पण यावर्षी सलग दुस-यांदा रास दांडिया खेळण्यासाठी उत्सुक आहे. प्रत्येक दिवशी नवनववीन कपडे नवनव्या गाण्यांवर गरब्याच्या नवनव्या स्टेप्स कारणं ही आमच्या सर्वांसाठी महत्त्वाची गोष्ट असते. म्हणूनच नवरात्र उत्सवाची आम्ही आतुरतेने वाट पाहत असतो. आम्ही जिथे गरबा खेळायला जातो तिथे वेगवेगळ्या स्पर्धा असतात. त्यामुळे युथक्राऊड वेगवगेळ्या प्रकारची कपडय़ांची फॅशन करतांना दिसतात.
प्राची घाणेकर, ठाणे
यंदाची शॉपिंग कलरफुल..
दरवर्षीच नवरात्र जवळ आली की, वेड लागतं ते म्हणजे दांडिया खेळायचं तसंच एक महिन्याआधी सुरू होते ती म्हणजे नवरात्रीची शाँपिंग. यंदाही मी नवरात्रीच्या नऊ दिवसांच्या रंगांनुसार टी-शर्ट खरेदी केले आहेत. या दिवसातच सर्व मित्र आम्ही एकत्र भेटतो. यावर्षी माझे हॉटेल मॅनेजमेंटचं शेवटचं वर्ष आहे आणि आता माझी ट्रेनिंग चालू होत आहे. मी सर्व तयारी करून ठेवली आहे. जसा वेळ मिळेल तसा मी दांडिया खेळायला जाणार आणि खूप धमाल करणार मित्रांसोबत..!
– हर्षल चव्हाण, खारघर
आपल्या आंनदासोबत पर्यावरणाचा समतोल सुद्धा..
दरवर्षी मी नवरात्रीची आतुरतेने वाट पाहात असते. देवी येणार म्हणून आनंद तर असतोच पण सर्वात जास्त अप्रूप गरब्याचे असते. यंदा ज्याठिकाणी कमीत कमी आवाजामध्ये गरबा खेळला जातो त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करणार आहे. जेणेकरून ध्वनी प्रदूषण कमी होईल. आपल्या आनंदासोबत आपण पर्यावरणाचा समतोल राखला पाहिजे.
– हर्षा पवार, भांडुप
नऊ संदेश देणा-या नऊ रांगोळ्या..
नवरात्री आमच्या सर्वांसाठी खास आहे. यावर्षी आम्ही देवीचा टॅटू काढणार आहोत. तो काही काळासाठीच असेल पण आम्ही ठरवलं आहे की, हे या वर्षी करायचे आहे. त्याचप्रमाणे सामाजिक संदेश देणा-या ९ रांगोळ्या आम्ही या दिवसांमध्ये काढणार आहोत. त्यात बेटी बचाव, पर्यावरणाचे रक्षण संसारख्या संदेशांचा समावेश आहे.
– कीर्ती म्हसकर, दादर
आता सर्वानी धरा ठेका
नवरात्र आली की लागलीच प्रत्येकाची वेगवेगळी तयारी चालू होते. दांडियाच्या साथीने नवरात्र गाजवणा-या तरुणांसाठी ही नवरात्र विशेष असते. परंतु लहान मुलांपासून ज्येष्ठ व्यक्तींनी याचा आनंद घ्यावा, यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील असतो. एक नृत्य कलाकार म्हणून मी प्रत्येकाला या कलेशी जोडण्याचा आणि त्यातील आनंद अनुभवता यावा यासाठी प्रयत्नशील असतो. गणपतीनंतर लागलीच मी दांडिया आणि गरबा यांचे प्रशिक्षण देणारे विशेष वर्ग भरवतो. ज्यात लहान मुलांसाठी, महिलांसाठी, संपूर्ण कुटुंबासाठी असे वेगवेगळय़ा भागापासून त्यांना पारंपरिक गरबा आणि दांडिया शिकवतो. त्यात मला स्वत:ला खूप आनंद मिळतो. मी सुद्धा मित्रांसमवेत नवरात्रीचा आनंद लुटतो.
संदेश रणदिवे , उल्हासनगर
नियमांचे पालनही करतो
लहानपणापासून नवरात्र म्हटले की नऊ रंगांबद्दल जास्त आकर्षण असते. माझ्या बहिणींसोबत वेळ काढून दांडिया खेळायला जाणे, मित्र मैत्रिणींसोबत वेगवेगळ्या ठिकाणी देवींचे दर्शन अशा ब-याच गोष्टी करत असते. रात्रीच्या नवरात्रीच्या गरब्याच्या रिंगमध्ये मनसोक्त नाचायला खूप आवडते. या उत्साहात मुलींनी कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून सतर्क राहावे. आनंद लुटताना आम्ही नियमांचे पालनही करतो.
सुशीला अशोक दळवी, कुलाबा