शहापूर तालुक्यात ७५ गावे व ३१६ पाडे पाणीटंचाईग्रस्त होणार आहेत.
शहापूर – शहापूर तालुक्यात ७५ गावे व ३१६ पाडे पाणीटंचाईग्रस्त होणार आहेत. पंचायत समिती शहापूरकडून पाणीटंचाई जाणवणा-या संभाव्य गावाची यादी केली असून, यात ७५ गावे व ३१६ पाडय़ांचा समावेश आहे. दोन कोटी २१ लाख ८५ हजार रुपयांचा आराखडा जिल्हा परिषदेकडे पाठवण्यात आला आहे.
बैलगाडीने पाणीपुरवठा करण्यासाठी ३९ गावे १५२ पाडय़ांसाठी ७५ लाख, तीन गावांच्या नळपाणीपुरवठा योजनांच्या दुरुस्तीसाठी २९ लाख २५ हजार, विंधन विहिरींसाठी १६४ पाडे व ३३ गावांसाठी तब्बल एक कोटी १७ लाख ६ हजार रुपये याप्रमाणे टंचाईग्रस्त आराखडा तयार करून वरिष्ठ स्तरावर पाठवण्यात आल्याचे धादवड यांनी सांगितले.