शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मुंबईतील सर्व व्यापा-यांनी आपले व्यवहार सोमवारी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई – शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मुंबईतील सर्व व्यापा-यांनी आपले व्यवहार सोमवारी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
बाळासाहेब ठाकरे हे खरे भूमीपुत्र होते. त्यांनी आयुष्यभर लोकांना एकत्र आणण्याचे काम केले, अशा शब्दांत व्यापारी संघटनेचे अध्यक्ष मोहन गुरुनानी यांनी सांगितले. मुंबईतल्या अनेक व्यापा-यांनीही संघटनेच्या निर्णय स्विकारत सोमवारी व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात मुंबई कृषी उत्पन्न बाजारपेठेचाही समावेश आहे.