तेलंगण राष्ट्र समिती आणि बिजू जनता दलाच्या खासदारांनी सोमवारी लोकसभेत गोंधळ घातल्याने लोकसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.
नवी दिल्ली – तेलंगण राष्ट्र समिती आणि बिजू जनता दलाच्या खासदारांनी सोमवारी लोकसभेत गोंधळ घातल्याने लोकसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या अभिभाषणानंतर खासदारांनी संसदेत गोंधळ घालण्यास सुरुवात केली.
टीआरएसच्या खासदारांनी आंध्र प्रदेश पुर्ननिर्मिती विधेयकाला विरोध करत गोंधळ घातला तर पोलावरम धरणाला विरोध करत बीजेडीच्या खासदारांनी संसदेत गोंधळ घातला. सभापती सुमित्रा महाजन यांनी खासदारांना आपल्या जागी बसण्यास सांगितले. मात्र त्यानंतरही खासदारांचा गोंधळ सुरुच राहिल्याने कामकाज तहकूब करण्यात आले.