अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालावधी आणखी तीन दिवसांनी वाढवण्यात आला आहे.
नवी दिल्ली – संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन शनिवारी संपणार होते मात्र या अधिवेशनाचा कालावधी आणखी तीन दिवसांनी वाढवण्यात आला आहे. १३ मेपर्यंत अधिवेशन सुरु राहणार आहे.
राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अधिवेशनाता कालावधी १३ मेपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला.
अनेक विधेयके संमत होणे बाकी आहे. त्यामुळे अधिवेशनाचा कालावधी तीन दिवसांनी वाढवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आल्याचे राजीव प्रताप रुडी यांनी सांगितले. १३ मेपर्यंत अधिवेशन सुरु राहणार आहे. कॅबिनेटच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे ते म्हणाले.