दुस-या क्रिकेट कसोटी सामन्याचा पहिला दिवस वाया
लंडन – भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुस-या कसोटीचा पहिला दिवस पावसामुळे वाया गेला. पावसामुळे मैदान ओले असल्याने तिस-या सत्रापर्यंत खेळ सुरू झाला नव्हता. खेळ वेळेवर सुरू न झाल्याने उपाहार आणि चहापान लवकर उरकून घेण्यात आले. दोन सत्रानंतरही मैदान खेळण्यायोग्य नसल्याने क्रिकेटपटूंसह चाहतेही निराश झाले. अनेक चाहते स्टेडियममध्ये बसून खेळ सुरू होण्याची वाट पाहताना दिसले.
दरम्यानच्या काळात भारताचा कर्णधार विराट कोहली आणि यजमान कर्णधार ज्यो रूट याने मैदानाची पाहणी केली. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिली कसोटी निकाली ठरली आहे. त्यामुळे ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावरील दुस-या सामन्याची उत्सुकता आहे.
भारताच्या क्रिकेटपटूंना देशी पद्धतीचे जेवण
लंडन – लॉर्ड्सवर सुरू झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या दुस-या कसोटीतील जवळपास निम्मा दिवस पावसामुळे वाया गेला. त्यामुळे वेळेपूर्वीच उपाहार (लंच) उरकून घेण्यात आले. या उपाहारासाठी भारतीय क्रिकेटपटूंना देशी पद्धतीचे जेवण देण्यात आले. त्यात चिकन करी, पनीर टिक्का आणि अनेक भारतीय खाद्यपदार्थाचा समावेश होता. पावसामुळे खेळाडूना मैदानात उतरता आले नाही. मात्र ‘लंच’मधील चिकन करी, पनीर टिक्का या आवडत्या खाद्यपदार्थावर चांगलाच ताव मारला.
भारताच्या क्रिकेटपटूंना परदेशात गेल्यावर सर्वात जास्त देशी खाद्यपदार्थाची समस्या भेडसावते. कारण भारतातील खाद्यपदार्थ परदेशात बनवले जात नाहीत. त्यामुळे परदेशात गेल्यावर आपल्याला भारतीय पद्धतीचे जेवण मिळावे, असे अनेकांना वाटत असते. इंग्लंडच्या क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) याची दखल घेतली असून लॉर्ड्स कसोटी सामन्याच्यावेळी भारतीय क्रिकेटपटूंना त्यांच्या आवडीचे खाद्यपदार्थ पुरवले.