मुंबईत लाच घेतल्याप्रकरणी आयकर विभागाच्या आयुक्तांसह सहाजणांना सीबीआयने अटक केली आहे.
मुंबई- मुंबईत लाच घेतल्याप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) आयकर विभागाच्या आयुक्तांसह सहाजणांना अटक केली आहे. सीबीआयने ही कारवाई मंगळवारी रात्री केली.
आयकर विभागाचे (लवाद) आयुक्त बी.बी. राजेंद्र प्रसाद यांचादेखील समावेष असल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
काही कंपन्यांवरमेहेरनजर केल्याचा आरोप या सहाजणांवर आहे. याबद्दल सीबीआयला माहिती मिळाली होती. त्यामुळे सीबीआयने गुप्तपणे या अधिका-यांच्या घरावर छापे टाकले. त्यावेळी लाच म्हणून देण्यात आलेली तब्बल दिड कोटी रुपयांची रक्कमही जप्त करण्यात आली आहे.