भारतीये रेल्वेच्या खानपान आणि पर्यटन महामंडळाने भारत दर्शनच्या चार पॅकेजेसची घोषणा केली असून गोवा व दक्षिण भारतासाठी ही योजना आहे.
नवी दिल्ली – भारतीये रेल्वेच्या खानपान आणि पर्यटन महामंडळाने भारत दर्शनच्या चार पॅकेजेसची घोषणा केली असून गोवा व दक्षिण भारतासाठी ही योजना आहे. दिल्ली व चंडीगढ येथून ही योजना राबवण्यात येणार आहे.
रेल्वेचे सर्वसमावेशक असे हे पॅकेज असून प्रवाशांना भारतातील प्रसिद्ध धार्मिक व पर्यटन स्थळांना घेऊन जाणार आहोत, असे आयआरसीटीसीच्या अधिका-याने सांगितले.
फेब्रुवारीच्या मध्यापासून ते एप्रिलच्या मध्यापर्यंत ही योजना राबवण्यात येणार असून त्यात अनेक शहरांना भेटी देता येतील. या पॅकेजसाठी प्रवाशांना दररोज प्रत्येकी ८३० रुपये खर्च करावा लागेल.
दिल्लीहून पहिले पॅकेज (१३ रात्री/१४ दिवस) असून १४ फेब्रुवारीपासून ते सुरू होईल. २७ फेब्रुवारीला त्याची मुदत संपेल. गोवा, एर्नाकुलम, पद्मनाभम, थिरुवनंतपुरम, कन्याकुमारी, रामेश्वरम-रामनाथ मंदिर आणि तिरुपती बालाजी या स्थळांचा त्यात समावेश आहे. सफदरजंग येथून रेल्वे सुरुवात करणार असून मोरादाबाद, बरेली, शाहजहानपूर, लखनौ, कानपूर, झाशी, बिना व भोपाळ अशी शहरे करेल.
दुसरे पॅकेज सफदरजंग येथूनच असून १६ ते २८ मार्च दरम्यान असेल. त्यात १२ रात्री आणि १३ दिवस असून तिरुपती बालाजी, कामाक्षी मंदिर, रामेश्वरम, रामनाथ मंदिर, कन्याकुमारी, म्हैसूर, बंगळुरु अशी शहरे असतील. चंडीगढहून असलेली रेल्वे ३१ मार्च ते १३ एप्रिलपर्यंत धावणार असून त्यात गोवा, एर्नाकुलम, पद्मनाभ मंदिर, कन्याकुमारी, रामेश्वरम, रामनाथ मंदिर अशी स्थळे असतील.