क्रिकेटच्या मैदानावरील रंजक घडामोडी
कसोटी इतिहासातील पहिला ‘टाय’ सामना या दिवशी घडला असता, पण ऑस्ट्रेलियाच्या जेरी हॅझलिट्चा ‘थ्रो’ चुकला आणि इंग्लंडच्या शेवटच्या जोडीने संघाला नेत्रदिपक विजय मिळवून दिला.
१९५६
विनू मंकड आणि पंकज रॉय यांनी न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या विकेटसाठी विक्रमी ४१३ धावांची भागीदारी केली. त्यावेळी पहिल्या विकेटसाठी भागीदारीचा तो विक्रम होता. त्या सामन्यात विनू मंकड यांनी २३१ धावा केल्या. त्यावेळी भारताकडून एकाच डावातील सर्वाधिक वैयक्तिक धावांचा तो विक्रम होता.
१९८३
माजी कर्णधार कपिलदेव यांनी पाकिस्तानविरुद्ध फैसलाबाद कसोटीत पहिल्या डावात सात विकेट घेतल्या, पण त्यासाठी २२० धावा मोजल्या. एकाच डावात २२० किंवा अधिक धावा मोजणारे ते पहिले भारतीय गोलंदाज ठरले.
१९८७
कसोटी क्रिकेटमध्ये ३००० धावा आणि ३०० विकेट घेणारे कपिलदेव दुसरे क्रिकेटपटू ठरले. त्यांच्याआधी इंग्लंडचे इयन बोथम यांनी अशी कामगिरी करून दाखवली होती. कपिल यांनी श्रीलंकेच्या रवी रत्नायकेला बाद करून ३००वा कसोटी बळी मिळवला.
१९९२
पाकिस्तानचे माजी कर्णधार आणि महान क्रिकेटपटू इम्रान खान यांचा कसोटी कारकीर्दीतील शेवटचा दिवस. फैसलाबादमधील त्या कसोटीत श्रीलंकेविरुद्ध इम्रान यांनी दुस-या डावात गोलंदाजी केली नाही. फलंदाजी करतानाही त्यांना केवळ २० व ० धावा करता आल्या.
२००८
भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील सिडनी कसोटीत खराब पंचगिरीमुळे वादग्रस्त ठरलेले वेस्ट इंडिजचे स्टीव्ह बकनर यांची आयसीसीने उर्वरित मालिकेतून हकालपट्टी केली. त्यांच्या जागी न्यूझीलंडचे बिली बावडेन यांची नियुक्ती करण्यात आली.
२०११
इंग्लंडने सिडनी येथे ऑस्ट्रेलियाचा डावाने पराभव करत २४ वर्षानंतर ऑस्ट्रेलियात अॅशेस मालिका ३-१ फरकाने जिंकली. विशेष म्हणजे पाच कसोटींच्या त्या मालिकेत इंग्लंडने तिसऱ्यांदा डावाने विजय नोंदवला होता. अॅड्रयू स्ट्राउसच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने हे यश मिळवले. मालिकेत सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारा इंग्लंडचा फलंदाज अॅलेस्टर कुकला ‘मालिकावीर’ म्हणून गौरवण्यात आले. त्या मालिकेत त्याने सात डावांत मिळून ७६६ धावा फटकवल्या होत्या.