राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शुक्रवारी महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघांसाठी आणखी तीन उमेदवार जाहीर करण्याचे संकेत दिले.
मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसने अजूनही तीन लोकसभा मतदार संघातील उमेदवारांची घोषणा केलेली नाही. या मतदार संघातून विद्यमान मंत्र्यांना निवडणूक लढवण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेने केली आहेत. त्यात रायगड मधून जलसंपदामंत्री सुनिल तटकरे आणि हातकलंगणेमधून ग्रामविकास मंत्री जयंत पाटील हे निवडणूक लढवण्याची दाट शक्यता आहे. त्याचे संकेतही प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी दिले आहेत. शिवाय मावळचा उमेदवारही ठरला असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी भवनमध्ये पत्रकारां बरोबर बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या वाट्याच्या २२ पैकी १९ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. मात्र हातकलंगणे, मावळ आणि हिंगोली मतदार संघातले उमेदवार जाहीर केलेले नाहीत. मतदारसंघ अदलाबदलीमध्ये रायगड मतदार संघ राष्ट्रवादीला मिळण्याची दाट शक्यता आहे. या मतदारसंघातून जलसंपदामंत्री सुनिल तटकरे यांना निवडणूक रिंगणात उतरवण्याच्या तयारीत पक्ष आहे. तर हातकलंगणेमधून जयंत पाटील यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे. तीनही मतदार संघातील उमदेवारांची नावे निश्चित झाल्याचे जाधव यांनी यावेळी सांगितले. लवकरच त्यांची घोषणा केली जाईल असेही ते म्हणाले.
दरम्यान शिवसेनेही नाशिक आणि उस्मानाबाद लोकसभा मतदार संघातील आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. त्यानुसार नाशिक मधून हेमंत गोडसे तर उस्मानाबाद मधून रवी गायकवाड यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
[EPSB]
राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभेसाठी उमेदवार जाहीर
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने गुरुवारी महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघांसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली.
[/EPSB]