मागेल त्याला शेततळे या योजनेतील ६.६० हेक्टर किमान धारण क्षेत्राची अट राज्य शासने शिथील केल्याने शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्य़ात १५५ शेततळ्याचे काम पूर्ण झाले आहे.
अलिबाग – मागेल त्याला शेततळे या योजनेतील ६.६० हेक्टर किमान धारण क्षेत्राची अट राज्य शासने शिथील केल्याने शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्य़ात १५५ शेततळ्याचे काम पूर्ण झाले आहे.शेती उत्पादनामध्ये शाश्वतता आणण्यासाठी तसेच दुष्काळावर मात करण्यासाठी शेततळे उपयुक्त असल्याने राज्यातील पर्जन्यावर आधारित कोरडवाहू शेतीसाठी पाणलोट व जलसंवर्धन माध्यामतून जलसिंचनाची उपलब्धता वाढविणे तसेच संरक्षित व शाश्वत सिंचनाची सुविधा निर्माण करण्यासाठी ‘मागेल त्याला शेततळे’ ही योजना राबविण्यात येत आहे.
कोकण विभागातील भौगोलिक परिस्थिती व शेतकऱ्यांची जमीनधारण क्षमता अत्यल्प असल्याने मागेल त्याला शेततळे या योजनेंतर्गत ०.६० हेक्टर किमान धारण क्षेत्राची अट शिथील करून ती ०.०२ हेक्टर करण्यास २० मे रोजी जारी केलेल्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना त्याचा लाभ होत आहे. रायगड जिल्ह्यामध्ये आतापर्यंत ७३३ अर्जाची ऑनलाईन नोंदणी झाली आहे. तालुकास्तरीय समितीने छाननी करून एकूण २७५ अर्जाना मंजुरी दिलेली असून तसे आदेशही निर्गमित करण्यात आले आहेत. मान्यताप्राप्त कामांपैकी ३० जून, २०१७ अखेर १५५ शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. रायगड जिल्हय़ासाठी एकूण ६८ कोटी ४८ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. यातील निधी संबंधित खातेदारांचे बँक खात्यावर आर.टी.जी.एस. ने जमा करण्यात
येत आहे.