मुंबई-गोवा महामार्गावर मंगळवारी झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात सहाजणांचा मृत्यू झाला.
रायगड- मुंबई-गोवा महामार्गावर मंगळवारी झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात सहाजणांचा मृत्यू झाला.
कोलाडजवळ तळवली गावाजवळ एका एसटी चालकाने समोरून येणा-या रिक्षाला जोरदार धडक दिली. या अपघातात चारजण जागीच ठार झाले. हा अपघात मंगळवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास झाला.
आशिष पिसाळ, वैभव शिंद, सुरेश तळवटकर, आणि संदेश दाबणे अशी मृत झालेल्या चौघांची नावे आहेत. हे सगळेजण माणगाव तालुक्यातील दहिवली गावचे रहिवासी होते.
लोणेरेजवळच्या टेमपाले गावच्या हद्दीजवळ एका दुचाकीची एसटीला जोरदार धडक बसल्याने अपघात झाला. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला. हा अपघात मध्यरात्री २.३० वाजण्याच्या सुमारास झाला.
शंकर ढेरे आणि मारुती कचरे असे मृत झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.
रायगड जिल्ह्यातील मुंबई-गोवा महामार्गावर रात्रीच्या वेळेस सलग झालेल्या दोन अपघातांमुळे मंगळवारची रात्र ही अपघाती रात्र ठरली.