बिहारी लोकांबद्दल आक्षेपार्ह विधान करणा-या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिल्ली न्यायालयाचा दिलासा मिळाला आहे.
नवी दिल्ली- बिहारी लोकांबद्दल प्रक्षोभक विधान करणा-या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिल्ली न्यायालयाचा दिलासा मिळाला आहे. राज यांनी २००८मध्ये महाराष्ट्रातील बिहारी लोकांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानाबद्दल त्याच्याविरुद्ध अजामीन पात्र वॉरंट बजावण्यात आली होती. दिल्ली उच्च न्यायालयाने या नोटीसीला स्थगिती दिली आहे.
राज ठाकरे यांनी २००८मध्ये छट पूजे दरम्यान बिहारी लोकांबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. त्यावर बिहारमधील वकील सुधीर कुमार ओझा यांनी याचिका दाखल केली होती. मुझफ्फपूर येथील न्यायालयाने राज ठाकरे यांच्या विरोधात अजामीन पात्र वॉरंट बजावले होते. ओझा यांच्याबरोबच झारखंडमधील सुधीर कुमार या वकीराने राज यांच्या विरोधात याचिका दाखल केली होती. राज यांनी बिहार आणि उत्तर प्रदेशमधील लोकांचा अपमान केल्याचे या याचिकेत म्हटले होते.
राज यांच्याविरोधात दखल करण्यात आलेल्या एकूण १६ खटले सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर दिल्ली न्यायालयात वर्ग करण्यात आले होते. या खटल्यासंदर्भात राज यांना गुरुवारी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र न्यायालयाने राज यांना सुनावणीदरम्यान उपस्थीत राहण्यातून सूट दिली आहे.
या संदर्भातील पुढील सुनावणी १६ एप्रिल रोजी होणार आहे.