राज्यात सगळय़ाच पातळीवर गुन्हेगारी वाढत आहेत. विनयभंग, बलात्कार आणि अपहरणाच्या घटना चिंताजनक आहेतच पण त्याचबरोबर चोरी, दरोडय़ाच्या प्रकरणामुळे अटकेत असलेले गुन्हेगार पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून जात आहेत. स्कॉटलंड यार्डच्या पोलिसांबरोबर एके काळी ज्या मुंबई पोलिसांची तुलना केली जात असे, ते पोलीसही आता झोपले आहेत, असे मुंबईतील गुन्हेगारीचा वाढता आलेख पाहता वाटते. देशातील सर्वाधिक सुरक्षित शहर म्हणून मुंबईकडे पाहिले जात होते. परंतु तेही आता महिलांसाठी आणि मुलींसाठी असुरक्षित बनत चालले आहे. गेल्या पाच महिन्यात शेतक-यांनी ११५० आत्महत्या केल्या आहेत. त्यात आता पाऊसही लांबला आहे. जणू काही राज्याला असुरक्षिततेचे ग्रहण लागले आहे. पण लोकांच्या, शेतक-यांच्या समस्या सोडवण्यात भाजपा-शिवसेनेला अपयश येत आहे. लोकांनी किती अपेक्षेने या सरकारकडे सत्ता सुपुर्द केली होती; परंतु हे सरकार सत्तेत आल्यापासून महिला आणि बालकांविरोधातील गुन्हय़ात वाढ झाली आहे. २,३९४ मुलांच्या अपहरणाच्या घटना घडल्या असून महिला आणि ५,२५० तरुणीच्या विनयभंग आणि बलात्काराच्या घटनाही घडल्या आहेत. मुंबईतही मुलीच्या अपहरणाचे प्रमाण वाढले आहे. मुंबई झोपत नाही, असे म्हटले जाते. त्यामुळे येथील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही उशिरापर्यंत सुरू असते. रिक्षा, टॅक्सी आणि रेल्वे वाहतूक सुरू असते. मुंबईत मोठय़ा प्रमाणात रोजगारही उपलब्ध होत असल्यामुळे या शहरात दररोज शेकडो लोक येत असतात. त्यात आर्थिक दुर्बळ घटकातील महिलाही असतात. अशा महिलांना, मुलींना जाळय़ात ओढण्याचे काम करणारे संघटीत गुन्हेगारही अशा अपहरणामागे असल्याचे बोलले जाते. सरकारचे, पोलीस यंत्रणेचे या सगळय़ा गोष्टींकडे लक्ष नाही, असे या घटनांवरून दिसते. लोकांना रोजगार मिळतो, इतर मूलभूत सोयीसुविधा मिळतात परंतु ते जर सुरक्षित नसतील तर मग कोणत्याही गोष्टीला काहीच महत्त्व राहत नाही. आपल्या कुटुंबातील सदस्य जर सुरक्षित नसतील तर कुटुंबप्रमुखाचे डोके ठिकाणावर राहत नाही. अशा लोकांना आपले कुटुंब सुरक्षित हवे आहे. महिला आणि बालकांबाबतच्या गुन्हय़ांचा निपटारा करण्यासाठी स्वतंत्र २७ विशेष न्यायालये स्थापन करण्यात येणार आहेत; परंतु ही न्यायालये स्थापन करण्यापेक्षा असे गुन्हे घडणार नाहीत, अशी परिस्थिती राज्यात निर्माण करणे आवश्यक आहे. गुन्हेगारांना जरब बसेल अशी पोलीस यंत्रणा आहे. परंतु तिचा वापर केला जात नाही. पोलिसांवर कोणाचाही वचक राहिलेला नाही. तरुणीच्या किंवा महिलेच्या एखाद्या साध्या तक्रारीकडे दुर्लक्ष करायचे आणि नंतर त्या तक्रारीचे एखाद्या गुन्हय़ात रूपांतर झाले की, आपले अस्तित्व सिद्ध करण्यासाठी धडपडायचे, ही जी पोलिसांची भूमिका आहे ती त्यांनी बदलली पाहिजे. राज्यात गुन्हय़ांचे प्रमाण जर वाढत असेल तर त्याला ते सरकार आणि तेथील पोलीस यंत्रणा जबाबदार आहे, असे म्हणावे लागेल. कारण राज्यातील सगळय़ाच नागरिकांची सुरक्षा ही सरकार आणि पोलीस यंत्रणेवर अवलंबून असते. त्याच वेळी न्यायपालिकेने गुन्हेगारांना कठोर शिक्षा केली तर समाज अधिक सुरक्षित बनेल. महागाईने लोक मेटाकुटीला आले आहेत, अशा परिस्थितीत इतरही अनेक सामाजिक गुन्हय़ांमुळे ते हतबल बनू लागले आहेत. सरकारने आपले कर्तव्य चांगला प्रकारे पार पाडले आणि गुन्हेगारांच्या छातीत धडकी भरेल, अशा प्रकारे पोलीस यंत्रणेने काम केले तर महिला आणि बालक सुरक्षित राहतील. प्रत्यक्ष गुन्हा घडताना तो रोखता येणे शक्य होणार नाही; परंतु तो गुन्हा घडल्यानंतर तशाच प्रकारचा गुन्हा पुन्हा घडू नये, या अनुषंगाने पोलीस यंत्रणा, न्यायपालिका आणि सरकारने निर्णय घेतले तर मुंबई आणि हे राज्य पुन्हा सुरक्षित राज्य बनेल. राज्य जर असुरक्षित बनले तर त्या राज्यात केली जाणारी गुंतवणूकही आटू लागेल. राज्य सुरक्षित ठेवण्यात नव्या सरकारला सगळय़ाच पातळय़ावर आतापर्यंत अपयश आले आहे.
Recent Comments
किल्ले जीवधन
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
अभिजात भाषा
on
आळशी मांजर
on
आमचा टॉम
on
छोटीशी सोनू
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
मनातली कविता
on
संपर्क
on
हेल्पलाइन
on
दगडफूल
on
हेल्पलाइन
on
संपर्क
on
संपर्क
on
भयाचे भूत..
on
मोदी करिष्मा
on
E-Book
on
गुणकारी शेपू
on
निष्ठावंत
on
संपर्क
on
संपर्क
on
५१ मध्ये ७
on
गर्दीच गर्दी
on
मूक मोर्चा
on
RSS NEWS
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
महात्मा…
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
रामघळ
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
वाढदिवस
on
वृक्षारोपण
on
रमाचा दुखणा
on
तगडे उमेदवार
on
आमची दिवाळी…
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
अनुभव
on
गीर गाय
on
सगुणेचा संप
on
तपास पथक
on
संपर्क
on
भुजंगासन
on
एकटेपणाची सल
on
संपर्क
on
ईश्वर
on
आयपीएल
on
“न्याय द्या”
on
“अभिवादन”
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
संपर्क
on
E-Book
on
हॉटेलचं हृदय
on
फसवणूक
on
भीषण आग..
on
आज टिप ऽऽर!
on
संपर्क
on
संपर्क
on
अमिषा पटेल..
on
संपर्क
on
माझी आई
on
मनातलं
on
वेलकम बॅक
on
संपर्क
on
शटर लाईफ
on
“कुराण वाचन”
on
चढणीचे मासे
on
संपर्क
on
वैशाख वणवा
on
आजोळचे दिवस
on
संपर्क
on
संपर्क
on
कचरा नकोच!
on
मनातलं
on
मनातलं
on
संपर्क
on
संपर्क
on
जैतापूरच..!
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
तो अन् मी
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
संपर्क
on
संपर्क
on
नूरा कुस्ती
on
“सन्नाटा”
on
खाकीला डाग!
on
सजीव गाथा
on
संपर्क
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
सिगारेट
on
संपर्क
on
सोशल पोलिस
on
गु-हाळ
on
जिंकणारच!
on
आम आदमी सेना
on
ग्रँड चव
on
पाणी
on
पाणी
on
जिंकणारच!
on
जिंकणारच!
on
चमकेशगिरी
on
म्हाळवस
on
सुमंगल यश
on
अर्नोल्ड
on
दहीहंडी
on
भूकंपानंतर…
on
वाघ तो वाघच
on
आदिती राव
on
मुंबई चिंब!
on
वाहतूकवेडा
on
स‘माज’
on
मैं हूँ ना!
on
मेट्रो आली
on
“हीच ती कार”
on
सत्तातूर !
on
विजय सलामी
on
मतदान करा..
on
नाजूक त्वचा
on
जागे व्हा
on
नाच रे मोरा…
on
काठयांचा खेळ
on
“विसर्जन”
on
रेल्वे ठप्प
on
रेल्वे ठप्प
on
भन्नाट
on
“सिंग साहब
on
ऊस पेटला
on
चतुरस्र श्री
on
पेन स्टॅण्ड
on
आनंदाची चाळ
on
चंड‘प्रतापी’
on
महाकुंभ
on
सैतानाचा बाप
on
सुखोई सफर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
बलिष्ठ गवा
on
मराठी बिराठी
on