चित्तूर येथील जंगलात २० तस्करांना ठार केल्याप्रकरणी हैदराबाद उच्च न्यायालयाने आंध्र प्रदेश सरकारला खुनाचा गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला आहे.
चेन्नई- चित्तूर येथील जंगलात २० तस्करांना ठार केल्याप्रकरणी हैदराबाद उच्च न्यायालयाने आंध्र प्रदेश सरकारला खुनाचा गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला आहे. भारतीय दंडविधान संहितेनुसार कलम ३०२ खाली अनसíगक मृत्यूची नोंद का करण्यात आली नाही, असा सवालही न्यायालयाने उपस्थित केला आहे.
याप्रकरणाची सखोल माहिती सोमवापर्यंत सादर करण्याचे आदेश न्यायालयाने राज्य सरकारला दिले असून केंद्रानेही या प्रकरणाचा अहवाल मागवला आहे.
आंध्र प्रदेशातील चित्तूर येथे मंगळवारी पोलिसांनी केलेल्या एन्काऊंटरमध्ये २० तस्कर ठार झाले होते. मात्र ही चकमक बनावट असल्याचा आरोप करत ते तस्कर नसून लाकूडतोडे असल्याचा दावा नागरी हक्क कार्यकर्त्यांनी केला आहे.
याप्रकरणी या कार्यकर्त्यांनी न्यायालयात धाव घेतल्यानंतर आंध्र प्रदेशचे वनमंत्री बी. गोपाळकृष्णन रेड्डी यांनी ते तस्करच असल्याचा आमच्याकडे पुरावा असल्याचे म्हटले आहे.