मुंबई गृहनिर्माण मंडळाच्या (म्हाडा) मे २०११च्या सोडतीत जी किंमत जाहिरातीत सांगण्यात आली होती त्यापेक्षा वाढलेल्या किंमतीतील व्याज व वाढीव नफा माफ करण्यात येईल, अशी माहिती गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी विधानसभेत दिली.
मुंबई- मुंबई गृहनिर्माण मंडळाच्या (म्हाडा) मे २०११च्या सोडतीत जी किंमत जाहिरातीत सांगण्यात आली होती त्यापेक्षा वाढलेल्या किंमतीतील व्याज व वाढीव नफा माफ करण्यात येईल, अशी माहिती गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी विधानसभेत दिली.
म्हाडातर्फे मे २०११च्या सोडतीच्या वेळी संकेत क्र. २५७ इमारत क्र. २३ डी व २३ ई पवई येथील गाळयांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यात गाळयांची तात्पुरती किंमत ३४ लाख ७५ हजार नमूद करण्यात आली हाती.
मात्र सोडत काढल्यानंतर या गाळयांची किंमत वाढवून ती थेट ४९ हजार ८३ हजार ८८६ इतकी करण्यात आली. अचानक दीडपट किंमत वाढवल्यामुळे ज्यांना गाळयांची लॉटरी लागली होती. त्यांची प्रचंड गैरसोय होत आहे.
ही वाढीव किंमत कमी करावी, अशी मागणी राजेश क्षीरसागर, सत्यजीत पाटील, शंभूराजे देसाई यांनी विधानसभेत केली होती. त्याला उत्तर देताना गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर म्हणाले की, ‘ज्यावेळी जाहिरात काढण्यात आली होती.
त्यातच या गाळयांची किंमत वाढू शकते, असे नमूद करण्यात आले होते. त्यानुसार वाढलेले बांधकाम साहित्याचे भाव, वाढलेले मजुरीचे दर आणि अॅल्युमिनियम खिडक्या वाढवल्यामुळे ही किंमत वाढल्याचे सांगितले.