मुंबईत परवडणा-या घरांचा प्रश्न अत्यंत गहन झाला आहे. म्हणूनच म्हाडाच्या परवडणा-या घरांच्या सोडतीतील लाभ गरजूंना मिळावा आणि त्यांचा धंदा होऊ नये यासाठी म्हाडा कायद्यात काही कडक नियम आहेत.
मुंबईत परवडणा-या घरांचा प्रश्न अत्यंत गहन झाला आहे. म्हणूनच म्हाडाच्या परवडणा-या घरांच्या सोडतीतील लाभ गरजूंना मिळावा आणि त्यांचा धंदा होऊ नये यासाठी म्हाडा कायद्यात काही कडक नियम आहेत. सोडतीतील घर पहिल्या पाच वर्षात विकता येत नाही. हा त्यातील महत्त्वाचा नियम आहे. मात्र म्हाडाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे काही सोडत विजेते आणि दलाल यांनी मिळून म्हाडाच्या घरांचा धंदा सुरू केला आहे. घर खरेदी -विक्रीच्या वेबसाइटवर त्यांनी बिनबोभाटपणे जाहिरातबाजी सुरू केली आहे. अशांनी गरजूंना म्हाडाचा हेतू कसा सफल होईल हा प्रश्न? अद्याप म्हाडाला पडलेला दिसत नाही.
सध्या प्रॉपर्टी वेबसाइटवर म्हाडाच्या घरांचा दलालांनी बाजार मांडला आहे. मीरा रोडच्या २०१२ च्या सोडतीतील घरांचा ताबा प्रक्रिया सुरू झाल्यावर दलालांनी या घरांची विक्रीची जाहिरातबाजी सुरू केली आहे. वेबसाइटवर म्हाडाचे नाव वापरून, मीरा रोडच्या घराची किंमत २३ ते २७ लाख रुपये असे ही जाहिरात आहे. हे कमी की काय या घरांच्या इमारतीचा फोटो तसेच संपर्कासाठी भ्रमणध्वनी क्रमांकही या दलालांनी वेबसाइटवरील जाहिरातीच्या खाली दिला आहे. म्हाडाच्या घरांचा म्हाडाचे नाव वापरून हा धंदा सुरू केला आहे. प्रहारने हे सविस्तर वृत्त प्रसिद्ध केल्यावर म्हाडा खडबडून जागी झाली. या वेबसाइटवर जाहिरात देणा-या दलालांविरोधात दक्षता विभागाकडे म्हाडाने तक्रार केली आहे. दलालानेही ही जाहिरात काढून टाकण्याची तयारी दर्शवली असल्याचे म्हाडातून सांगण्यात येते. कारवाईबाबत म्हाडाच्या हालचाली सध्या सुरू असल्या तरी तो वरवरचा दिखावा ठरू नये. कारण या पूर्वीच्या सोडतीत बनावट कागदपत्रे सादर करून घरे हडपणारे दलाल अद्याप मोकाट आहे. त्यामुळे या दलालांवरही कारवाईच्या हालचाली काही दिवसांनी बंद झाल्या तर कु णालाही नवल वाटण्याचे कारण नाही.
एकीकडे म्हाडाने सोडत ऑनलाइन क रून एक पाऊल पुढे टाकले आहे. घरांच्या विजेत्यांची नावे व त्या संबंधित सर्व माहिती आता म्हाडाच्या संकेत स्थळावर प्रसिद्ध के ली जाते. सोडतीत पारदर्शकपणा आणण्याचा प्रयत्न म्हाडाचा आहे. पूर्वी ऑनलाइन नसल्याने दलालांकडून घरे हडपण्याचा प्रकार सर्रास होत होता. प्रतीक्षा यादीवर असणाऱ्यांना कोण पात्र झाले, कोण अपात्र याचा काहीही ठावठिकाणा लागत नव्हता. आता म्हाडा आपल्या संकेतस्थळावर विजेत्यांची यादी व इतर माहिती प्रसिद्ध करीत असल्याने हे प्रकार थांबण्यास मदत झाली आहे. म्हाडाच्या कार्यालयातील सर्व मजल्यावर व बाहेर कार्यालय परिसरात अलीकडेच सीसीटीव्ही लागले आहेत. त्यामुळे दलाल व इतर गैरव्यवहारावर म्हाडाला आता नजर ठेवता येणार आहे. दलालांना नाकेबंदी होतेय हे लक्षात आल्यावर त्यांनी आता म्हाडा वसाहती व अशा प्रकारच्या जाहिराती प्रसिद्ध करून दलालीला सुरुवात केली आहे.
दलालांचे म्हाडाचे निर्णय व इतर प्रक्रियेवर बारकाईने लक्ष असल्याचे यावरून स्पष्ट होते. म्हाडाचे घर लागल्यावर पाच र्वष न थांबता ते लगेच भाडय़ाने देता येईल असा नियम म्हाडाने गेल्यावर्षीच्या सप्टेंबर महिन्यात घेतला. त्याचे परिपत्रक काढून या नियमाच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली. भाडय़ाने घर द्यायचे असेल तर म्हाडाची परवानगी घ्यावी, त्यासाठी अर्ज व घराच्या प्रकारानुसार सुरुवातीला अनामत रक्कम भरून घर भाडय़ाने देण्याचा नियम आहे. या नियमामुळे म्हाडाला मोठय़ा प्रमाणात महसूल मिळणार आहे. मात्र या नियमाकडे म्हाडाच्या अधिका-याने दुर्लक्ष केल्याने आता येथेही दलालांनी संधी सोडली नाही. घर खरेदी विक्रीच्या जाहिरातीवर म्हाडाची घरे भाडय़ाने देणे आहे. किती अमूक ठिकाणी किती भाडे व अनामत रक्कम हेही नमूद क रण्यात आले आहे. वेबसाइटवर दलालाने आपले नाव व भ्रमणध्वनीही दिला आहे.
घरांची विक्री तसेच त्याची कि मत आदी वेबसाइटवर देऊन दलालांची दलाली तेजीत सुरू आहे. म्हाडाच्या परवानगीशिवाय ही जाहिरात देण्यात आली आहे. त्यामुळे अशा दलालांवर कायद्यानुसार गुन्हा नोंदवायला हवा. तशा हालचाली सुरू केल्या असल्या तरी पुढे त्या किती टिकतील याबाबत शंका आहे. गिरणी कामगारांच्या घरांचा ताबा घेतल्यानंतर दलालांमार्फत लगेच घरे विकण्याचे प्रकार सुरू झाले. २५ टक्के घरांची विक्री झाली असल्याची चर्चा आहे. अशा प्रकारांवर काहीही कारवाई होत नसल्याने दलालांचे फावले आहे. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव येथील शहिदांच्या पत्नींची घरे हडप करणा-या दलालांवर अद्याप कारवाई झालेली नाही. त्यानंतरही काही दलालांनी घरे हडपण्याचा प्रकार केला. मात्र अद्याप कारवाई न झाल्याने हे दलाल अद्याप मोकाट आहेत. म्हाडा सोडत पारदर्शकपणा करून एक पाऊल पुढे टाकले आहे. सध्याच्या परिस्थितीनुसार जुन्या काही नियमातही म्हाडाने बदल के ले आहे. मात्र दलालांच्या या दलालीमुळे म्हाडाच्या चांगल्या कामाची चर्चा मागे पडत असल्याचे सध्याचे चित्र आहे, याकडे म्हाडाने लक्ष वेधणे आवश्यक झाले आहे.