मोदी सरकार धर्मनिरपेक्षतेला आव्हान देत असून सर्वसामान्यांनी एकत्रित येणे गरजेचे आहे, असे कॉँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
नवी दिल्ली – देश कठीण परिस्थितीतून जात असून सत्ताधारी समाजात द्वेष पसरवत आहेत. मोदी सरकार धर्मनिरपेक्षतेला आव्हान देत असून सर्वसामान्यांनी एकत्रित येणे गरजेचे आहे, असे कॉँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
जामिया उलेमा-ए-हिंद या संस्थेने आयोजित केलेल्या राष्ट्रीय एकात्मता परिषदेत गांधी यांनी संदेश पाठवला. आपल्या संदेशात त्या म्हणाल्या की, सध्या देश अत्यंत कठीण परिस्थितीतून जात आहे. मोदी सरकार समाजात द्वेष पसरवत आहेत. विशेष म्हणजे हे सत्ताधारी धर्मनिरपेक्षतेला आव्हान देत आहेत. ही बाब चिंताजनक आहे. याचा सामना करण्यासाठी नागरिकांनी जात, धर्म, वर्ण विसरून एकत्रित येणे गरजेचे आहे, असे आवाहन त्यांनी केले.
‘जमिया उलमा ए हिंद’ या संस्थेने कॉँग्रेसबरोबर स्वातंत्र्यलढय़ात मोठे योगदान दिले आहे. सध्या काळात ‘जमिया उलमा ए हिंद’ या संस्थेची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. देशातील अखंडता व एकात्मता टिकवण्यासाठी जमियाने पाऊल उचलावे. त्यांनी हे काम केल्यास देशात त्याचे चांगले परिणाम दिसतील, असे गांधी यांनी संदेशात म्हटले.