सामान्यांना महागाईचे दिन दाखवणा-या मोदी सरकारच्या अर्थसंकल्पावर सर्वच विरोधकांकडून टीकास्त्र सोडले जात आहे.
नवी दिल्ली – सामान्यांना महागाईचे दिन दाखवणा-या मोदी सरकारच्या अर्थसंकल्पावर सर्वच विरोधकांकडून टीकास्त्र सोडले जात आहे. काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनीही मोदी सरकारचा हा अर्थसंकल्प गरिबांसाठी नसून उद्योजक आणि कॉर्पोरेटसाठी असल्याचे त्यांनी सांगितले.
हा अर्थसंकल्प केवळ मोठ्या कॉर्पोरेट कंपन्या आणि उद्योगांसाठी आहे. लोकसभा निवडणुकीत ज्या श्रीमंत लोकांनी त्यांना(भाजपा)ला पाठिंबा दिला त्या लोकांसाठी हा अर्थसंकल्प आहे. गरिबांसाठी हा अर्थसंकल्प नाही असे खर्गे यांनी संसदेबाहेर पत्रकारांशी बोलताना सांगितले.
आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमती कमी झाल्याने सरकारला मोठा फायदा झाला आहे. मात्र गरिबांच्या विकासासाठी याचा फायदा होणार नाही. बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये होणा-या आगमी विधानसभा निवडणुकांवर डोळा ठेवून हा अर्थसंकल्प तयार करण्यात आला. या अर्थसंकल्पात नवीन असे काहीच नाही. जुन्याच योजना नव्या नावांनी मांडण्यात आल्याचे खर्गे म्हणाले.