उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यात जोरदार पावसामुळे घर कोसळून एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला.
मेरठ- उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यात जोरदार पावसामुळे दोन मजली इमारत कोसळून एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला. तर अन्य काहीजण गंभीर जखमी आहे. मेरठ जिल्ह्यातील कुडी गावामध्ये ही घटना घडली.
विजयपाल प्रजापती यांचे कुटुंब या इमारतीत राहत होते. मुसळधार पावसामुळे ही इमारत कोसळली.
यामध्ये विजयपाल त्यांची सुन सुमन (२६) आणि विजयपाल यांचे नातू मयंक (३), खुशी (५) आणि धुरजान (७) यांचा मृत्यू झाला. तर विजयपाल यांचा मुलगा नरेंद्र गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ढिगा-याखाली आणखी काहीजण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी बचावकार्य युद्ध पातळीवर सुरू आहे.