पृथ्वीवर तुम्ही बरीच गावं, शहरं बघितली असतील. पण पृथ्वीशिवाय एक वेगळे जग आहे जेथे या जगाला सोडून गेल्यानंतर मनुष्याला जावे लागते. या जगात व्यक्ती स्वत:हून जात नाही तर यमाचे दोन दूत घेऊन जातात. जेवढे भयानक यमदूत असतात त्यापेक्षाही भयानक आणि खतरनाक इथली गावं असतात.
या गावांची संख्या एक नसून पूर्ण सोळा आहे आणि जीवनाचे पाप कर्म करणा-या मनुष्याला या सर्व गावांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कष्टांना समोरे जाऊन शेवटी यमपुरी पोहोचायचे असते. या भयानक गांवांबद्दल गरूड पुराणात विस्ताराने वर्णन करण्यात आले आहे.
या गावांची नावे आहेत सौम्यपूर, सौरिपूर, गन्र्धवपूर, शैलगाम, क्रौंचपूर, विचित्र भवन, बह्यपदपूर, दु:खपूर, नानाक्रन्दपूर, सुतप्तभवन, रौद्रपूर, पयोवर्षणपूर, शीताढयपूर आणि बहुभीतिपूर.
विष्णू यांनी गरुडाला सांगितले आहे की, या गावांच्या मार्गात तर विश्रामासाठी वृक्षाची सावली आहे आणि न कुठे अन्नादी, ज्यामुळे प्राणाची रक्षा होऊ शकते. मार्गात प्रलयकालच्या वेळेस बरेच सूर्य चमकतात, ज्यामुळे पिंडाने तयार केलेले शरीर तापत राहते. पिण्यासाठी पाण्याचा एकही थेंब मार्गात कुठेही उपलब्ध नसतो.
या मार्गात एक असिपत्र नावाचे वन आहे. या वनात कावळा, घुबड (उल्लू) गिद्घ, मधमाशी, मच्छर तथा ब-याच जागेवर जंगलाची आग आहे. या सर्वापासून पिडा भोगत प्रेतात्मा कधी मल-मूत्र व रक्ताच्या चिखलात पडतो तर कधी अंधार असलेल्या विहिरीत जाऊन आदळतो.
या मार्गात मिळणारे कष्ट एवढे भयानक आहेत की, ज्यांना वाचून मन भयभीत होऊ शकते. गरूड पुराणात मृतक संस्कारपासून मृत्यूनंतरच्या स्थितीचे वर्णन मिळते.