मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी दीड वर्ष उरले आहे. मात्र, या या निवडणुकीचे पडघम आतापासूनच वाजू लागले आहेत.
मुंबई- मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी दीड वर्ष उरले आहे. मात्र, या या निवडणुकीचे पडघम आतापासूनच वाजू लागले आहेत. मुंबई महापालिकेने या निवडणुकीसाठी मतदार नोंदणीच्या कामाला सुरुवात करण्याचे ठरवले आहे. या निवडणुकीसाठी ८ ऑक्टोबरपासून मतदार नोंदणीची विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. ही मोहीम ७ नोव्हेंबर दरम्यान मतदार नोंदणी जनजागृती मोहीम राबवली जाणार आहे.
मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी दीड वर्ष शिल्लक असली तरी या निवडणुकीचे पडघम आतापासूनच वाजू लागले आहेत. एकीकडे ही निवडणूक डोळयासमोर ठेवून भाजपा आतापासून महापालिकेची प्रतिमा मलिन करत शिवसेनेचे अपयश व त्यांचा भ्रष्टाचार बाहेर काढण्याचे काम करत कामाला लागली असताना महापालिकाही या निवडणुकीसाठी मतदार नोंदणीच्या कामाला लागली आहे. या निवडणुकीसाठी ८ ऑक्टोबरपासून मतदार नोंदणीची विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे.
आगामी महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ८ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर दरम्यान मतदार नोंदणी जनजागृती मोहीम राबवली जाणार आहे. या मोहिमेसाठी मुंबईतील शेकडो महिला स्वयंसेवी संस्थांची मदत घेण्यात येणार आहे. या मोहिमेत एक हजारांहून केंद्रे तसेच एक हजार केंद्र अधिकारी सहभागी होणार आहे.
सन २००१मध्ये झालेल्या जनगणनेत मुंबईची लोकसंख्या १ कोटी १९ लाख होती व त्यानंतर झालेल्या २०११च्या जनगणनेत सुमारे पाच ते सहा लाखांनी वाढ होऊन १ कोटी २४ लाखांवर गेली होती. जनगणनेनुसार वॉर्डातील मतदार संख्येत वाढ झाली असल्यास लोकसंख्येच्या प्रतिनिधित्वासाठी मतदार संघात वाढ केली जाते.
मात्र ही वाढ मोठया प्रमाणात नसल्याने महापालिका मतदार संघात कोणताही बदल होणार नसल्याचे स्पष्ट संकेत पालिकेचे अतिरिक्त आयुक्त एस. व्ही. आर श्रीनिवास यांनी सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिले.
एक जानेवारी २०१६ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण करणा-या तरुण-तरुणींना आपली नावे मतदार यादीत समाविष्ट करता येतील. नवीन मतदार नोंदणी, नाव रद्द करणे, निवासी पत्त्यातील बदल, दुबार, मृत, स्थलांतरितांसह मतदार नोंदणीशी संबंधित उपक्रम महापालिकेच्यावतीने हाती घेण्यात आला असल्याची माहिती श्रीनिवास यांनी दिली. यावेळी उपायुक्त मिलिन सावंत तसेच निवडणूक विभागाचे अधिकारी उपस्थित होते.