खंडाळा स्टेशनजवळ मालगाडीचे दोन डबे रुळावरून घसरल्याने पुणे-मुंबई दरम्यान ठप्प झालेली वाहतूक आज सकाळपासून पुन्हा सुरू झाली आहे.
मुंबई- खंडाळा स्टेशनजवळ मालगाडीचे दोन डबे रुळावरून घसरल्याने पुणे-मुंबई दरम्यान ठप्प झालेली वाहतूक आज सकाळपासून पुन्हा सुरू झाली आहे. या अपघातामुळे पुणे मार्ग भारतात जणा-या अनेक लोकल गाडय़ा काल रद्द कराव्या लागल्या होत्या.
खंडाळा स्टेशनजवळ गुरुवारी संध्याकाळी चारच्या सुमारास मालगाडीचे दोन डबे रुळावरून घसरले. यात रुळालगतचे खांबही कोसळले. अपघातात रेल्वे रुळाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघातानंतर पुण्याच्या दिशेने जाणा-या एक्स्प्रेस खोळंबल्या असून लोणावळा स्टेशनवर प्रवाशांची गर्दी वाढली होती.
अपघातामुळे मुंबईकडे येणा-या काही गाडय़ांची वाहतूक पुणे रेल्वे स्थानकांत खंडीत करण्यात आली होती. त्यामुळे पुणे रेल्वे स्थानकांत गोंधळाची परिस्थिती हेाती. रेल्वेच्या पथकाने तातडीने युद्ध पातळीवर काम सुरू केले होते. पहाटे काम काही काम झाल्यानंतर एक लाईन सुरू करण्यात आली होती. आज सकाळी दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर वाहतूक पूर्ववत सुरू झाल्याची माहिती, मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाने कळविले आहे.