इशान्य भारतातील मिझोराम राज्य गुरुवारी रात्री भूकंपाच्या धक्क्याने हादरले.
![संग्रहित छायाचित्र](http://prahaar.in/wp-content/uploads/2013/08/earthquake-symbolic.jpg)
ऐझवाल – ईशान्य भारतातील मिझोराम राज्य गुरुवारी रात्री भूकंपाच्या धक्क्याने हादरले. गुरुवारी रात्री उशिरा लोक गाढ झोपेत असताना मिझोरामला भूकंपाचा धक्का बसला. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ५.४ मोजण्यात आली आहे.
बांगलादेशातील चितगॉंगमधील डोंगराळ भागात भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचे राज्याचे भूगर्भशास्त्र आणि खनिज स्त्रोत विभागाचे संचालक एच. लालेनमाविया यांनी सांगितले.
मिझोराम-म्यानमार सीमेवरील गावांनाही या भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपामुळे राज्यात कुठेही जिवीत अथवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र भूकंपाच्या हाद-यांमुळे काहीवेळासाठी भितीचे वातावरण पसरले होते.