विधानसभा निवडणुकांच्या सत्रात चार राज्यांच्या निवडणुकांना फार महत्त्व दिले गेले. त्यामानाने ईशान्य भारतातील मिझोराममध्येसुद्धा निवडणूक होत आहे, याकडे फार कमी लक्ष दिले गेले. ईशान्य भारतातील राज्यांकडे देशात उपेक्षेने पाहिले जाते. त्यातून असा प्रकार घडला. परंतु या निवडणुकीत काँग्रेसला सलग दुस-यांदा विजय मिळाला आहे. २००८ सालच्या निवडणुकीत काँग्रेसने मिझो नॅशनल फंटला सत्ताभ्रष्ट करून सत्ता मिळवली होती. ती या वेळेसही राखली आहे. काँग्रेसचे मुख्यमंत्री लाल ठाणहावला यांच्या नेतृत्वाखाली मिळालेला हा सलग दुसरा विजय आहे. त्या आधी म्हणजे १९९८ आणि २००३ या दोन निवडणुकांमध्ये मिझो नॅशनल फ्रंटने विजय मिळवला होता. त्या आधीच्या दोन निवडणुका म्हणजे १९८९ आणि १९९३ अशा दोन निवडणुका काँग्रेसने जिंकलेल्या होत्या. मिझोराममधील सर्वसामान्य कोणत्याही पक्षाला दर १० वर्षानी स्पष्ट कौल देत असतात. आता काँग्रेसला कौल मिळाला आहे. २००८च्या निवडणुकीत काँग्रेसला ३९ टक्के मते मिळाली होती आणि काँग्रेसने ४० पैकी ३२ जागा जिंकल्या होत्या. त्यांच्या विरोधातल्या तीन मुख्य पक्षांना मिळून ४१ टक्के मते मिळाली होती. मात्र त्यांना तिघांना मिळून सात जागा मिळाल्या होत्या. या आकडेवारीचा बोध घेऊन हे तीन पक्ष यावेळी एकत्र आले आणि त्यांनी मिझोराम डेमोक्रेटिक अलायन्स (एमडीए) ही आघाडी स्थापन केली. परंतु त्यांचे मताच्या बेरजेचे गणित जुळले नाही. निवडणुकीत मतांची बेरीज महत्त्वाची नसते तर हाती असलेल्या मतांशी होणारा जनभावनांचा गुणाकार महत्त्वाचा असतो आणि या नियमानुसार, यात विरोधी आघाडीला जनमताचा गुणाकार करता आला नाही. परिणामी त्यांना यावेळीही सत्ता हस्तगत करता आली नाही. मुख्यमंत्री लाल ठाणहावला यांनी या एकत्रीकरणाचा आपल्यावर काही परिणाम होणार नाही, असे स्पष्ट केले होते आणि तसेच घडले. मिझोराम या राज्यात ख्रिश्चनांची संख्या मोठी आहे आणि मतदानावर चर्चचा प्रभाव आहे. त्याचा विचार करून ललथानहावला यांच्याविषयी एक वाद उपस्थित करण्यात आला. त्यांनी कोलकात्याच्या एका मंदिरात जाऊन देवीची पूजा केली आणि कपाळावर उभे गंध लावले. त्यांचा अशा गंधातला फोटो जाणीवपूर्वक सर्वत्र झळकवण्यात आला आणि ते ख्रिश्चानिटीशी प्रतारणा करत असल्याचे सांगण्यात आले. मात्र काँग्रेस पक्षाने त्याकडे दुर्लक्ष केले आणि नंतर त्या प्रचाराची तीव्रता वाढायला लागल्यानंतर मिझोरामचे दिवंगत नेते मिझो नॅशनल फ्रंटचे संस्थापक लाल डेंगा यांचा एक फोटो प्रसिद्ध केला. त्या फोटोत लाल डेंगा एका गुरुद्वारात पूजा करताना दिसतात. त्यांच्या डोक्यावर शिखांसारखा पंचाही आहे. तो फोटो प्रसिद्ध होताच मिझो नॅशनल फ्रंटने लाल ठाणहावला यांच्याविरुद्ध सुरू केलेली ती मोहीम बंद केली. काँग्रेसच्या जमीन वापरविषयक धोरणामुळे काँग्रेसचा विजय सुखकर झाला. मिझोरामचे ६० टक्के क्षेत्र जंगलाखाली राहावे व उर्वरित ४० टक्के क्षेत्राचा विकास व्हावा, यासाठी सरकारने ही योजना आखली होती. या योजनेंतर्गत शेतक-यांना दरडोई एक लाख रुपये एवढे अनुदान जमीन विकासासाठी म्हणून दिले गेले. या योजनेची अंमलबजावणीसुद्धा काळजीपूर्वक व परिणामकारकपणे झाली. त्याचा फायदा काँग्रेसला मिळाला.
मिझोरामची जनता काँग्रेसच्या पाठीशी
Recent Comments
किल्ले जीवधन
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
अभिजात भाषा
on
आळशी मांजर
on
आमचा टॉम
on
छोटीशी सोनू
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
मनातली कविता
on
संपर्क
on
हेल्पलाइन
on
दगडफूल
on
हेल्पलाइन
on
संपर्क
on
संपर्क
on
भयाचे भूत..
on
मोदी करिष्मा
on
E-Book
on
गुणकारी शेपू
on
निष्ठावंत
on
संपर्क
on
संपर्क
on
५१ मध्ये ७
on
गर्दीच गर्दी
on
मूक मोर्चा
on
RSS NEWS
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
महात्मा…
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
रामघळ
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
वाढदिवस
on
वृक्षारोपण
on
रमाचा दुखणा
on
तगडे उमेदवार
on
आमची दिवाळी…
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
अनुभव
on
गीर गाय
on
सगुणेचा संप
on
तपास पथक
on
संपर्क
on
भुजंगासन
on
एकटेपणाची सल
on
संपर्क
on
ईश्वर
on
आयपीएल
on
“न्याय द्या”
on
“अभिवादन”
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
संपर्क
on
E-Book
on
हॉटेलचं हृदय
on
फसवणूक
on
भीषण आग..
on
आज टिप ऽऽर!
on
संपर्क
on
संपर्क
on
अमिषा पटेल..
on
संपर्क
on
माझी आई
on
मनातलं
on
वेलकम बॅक
on
संपर्क
on
शटर लाईफ
on
“कुराण वाचन”
on
चढणीचे मासे
on
संपर्क
on
वैशाख वणवा
on
आजोळचे दिवस
on
संपर्क
on
संपर्क
on
कचरा नकोच!
on
मनातलं
on
मनातलं
on
संपर्क
on
संपर्क
on
जैतापूरच..!
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
तो अन् मी
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
संपर्क
on
संपर्क
on
नूरा कुस्ती
on
“सन्नाटा”
on
खाकीला डाग!
on
सजीव गाथा
on
संपर्क
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
सिगारेट
on
संपर्क
on
सोशल पोलिस
on
गु-हाळ
on
जिंकणारच!
on
आम आदमी सेना
on
ग्रँड चव
on
पाणी
on
पाणी
on
जिंकणारच!
on
जिंकणारच!
on
चमकेशगिरी
on
म्हाळवस
on
सुमंगल यश
on
अर्नोल्ड
on
दहीहंडी
on
भूकंपानंतर…
on
वाघ तो वाघच
on
आदिती राव
on
मुंबई चिंब!
on
वाहतूकवेडा
on
स‘माज’
on
मैं हूँ ना!
on
मेट्रो आली
on
“हीच ती कार”
on
सत्तातूर !
on
विजय सलामी
on
मतदान करा..
on
नाजूक त्वचा
on
जागे व्हा
on
नाच रे मोरा…
on
काठयांचा खेळ
on
“विसर्जन”
on
रेल्वे ठप्प
on
रेल्वे ठप्प
on
भन्नाट
on
“सिंग साहब
on
ऊस पेटला
on
चतुरस्र श्री
on
पेन स्टॅण्ड
on
आनंदाची चाळ
on
चंड‘प्रतापी’
on
महाकुंभ
on
सैतानाचा बाप
on
सुखोई सफर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
बलिष्ठ गवा
on
मराठी बिराठी
on