मागील काही दिवसांपासून हुलकावणी देत असलेला मान्सून अखेर कोकण पट्टयात दाखल झाला आहे.
ठाणे- मागील काही दिवसांपासून हुलकावणी देत असलेला मान्सून अखेर कोकण पट्टयात दाखल झाला आहे. शनिवारी पहाटेपासून ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे.
वरुणराजाच्या या अचानक झालेल्या एंट्रीने सकाळी छत्रीशिवाय कामावर जायला निघालेल्या चाकरमान्यांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली.
मागील अनेक दिवसांपासून सर्वांनाच मान्सूनच्या आगमनाची प्रतीक्षा होती. त्यात मागील वर्षी मे महिन्याअखेरच आलेला मान्सून यावर्षी मात्र जून अर्धा संपत आला तरी वाट पाहायला लावत होता.
शुक्रवारीच मान्सून येत्या २४ तासांत महाराष्ट्रात दाखल होण्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवला होता. त्यानंतर अखेर शनिवारी सकाळपासून मान्सून कोकण पट्टयात दाखल झाला आहे.