लोकसभा निवडणुकीतील महिला उमेदवारांच्या संरक्षणासाठी पुरुष सुरक्षा रक्षकांसोबतच ‘महिला सुरक्षा रक्षक’ नेमण्याचा निर्णय बुधवारी निवडणूक आयोगाने घेतला.
नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीतील महिला उमेदवारांच्या संरक्षणासाठी पुरुष सुरक्षा रक्षकांसोबतच ‘महिला सुरक्षा रक्षक’ नेमण्याचा निर्णय बुधवारी निवडणूक आयोगाने घेतला.
महिलांच्या सुरक्षा आणि संरक्षणासाठी सामाजिक दृष्टिकोनातून हा निर्णय घेतल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले. निवडणुकीसाठी महिला अथवा पुरुष उमेदवारांसाठी आतापर्यंत फक्त पुरुष सुरक्षा रक्षक नेमले जात होते. मात्र सध्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर असल्याने महिला उमेदवारांच्या संरक्षणासाठी पुरुष सुरक्षा रक्षकांसोबतच महिला सुरक्षा रक्षक नेमण्याचा निर्णय घेतला असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच काँग्रेसच्या उमेदवार नगमा यांच्याशी प्रचारसभेत एका युवकाने छेड काढल्याची घटना घडली होती. या प्रकरणी काँग्रेसने नगमा यांची सुरक्षा वाढवण्यात यावी याबाबतचे पत्र निवडणूक आयोगाला लिहिले होते.