वाघांना वाचविण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने विविध उपाययोजना केल्या जात असताना गेल्या सहा महिन्यात १६ वाघांचा मृत्यू झाल्याची धक्कादाय माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्रकल्पाच्या अहवालातच ही बाब उघड झाली आहे.
मुंबई – वाघांना वाचविण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने विविध उपाययोजना केल्या जात असताना गेल्या सहा महिन्यात १६ वाघांचा मृत्यू झाल्याची धक्कादाय माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्रकल्पाच्या अहवालातच ही बाब उघड झाली आहे. यामुळे राज्य शासनाने वाघ वाचविण्यासाठी केलेल्या विविध प्रयत्नांचे दावे फोल ठरले आहेत.वाघांना वाचविण्यासाठी मोठय़ा प्रमाणात मोहीम राबविली जात आहे. त्यासाठी विविध उपययोजना केल्या जात आहेत. तरीही वाघांच्या शिकारीचे प्रमाणही वाढतच आहे. अलिकडेच आलेल्या व्याघ्र संवर्धन प्रकल्पाच्या अहवालात २०१७ च्या पहिल्या सहा महिन्यात महाराष्ट्रात तब्बल १६ वाघ दगावल्याची माहिती समोर आली आहेत. या १६ वाघां पैकी १२ वाघांचा नैसर्गिक मृत्यू झाला आहे, तर ४ वाघांची शिकार करण्यात आली आहे. २०१० ते २०१७ दरम्यान राज्यात तब्बल ९५ वाघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती या अहवालात उघड झाली आहे. वाघांची शिकार करणा-या अंतरराष्ट्रीय टोळय़ा कार्यरत असून त्या स्थानिक आदिवासी तरुणांना हताशी धरून वाघांची शिकार केली जाते. वाघांचे कातडे, त्यांच्या पायांची नखे याची मोठय़ा प्रमाणात तस्करी केली जाते. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी शासनाकडून नवव्या घोषणा केल्या जात आहेत. तरीही तस्करीला आळा घालण्यात सरकारला यश आलेले नाही.
महाराष्ट्रात २०१० सालापासून झालेल्या ९५ वाघ्यांच्या मृत्यू पैकी ३१ वाघांची शिकार झाली असल्याचे उघड झाले आहे. महाराष्ट्रानंतर वाघांच्या मृत्यूमध्ये मध्यप्रदेशचा नंबर लागत असून तेथे गेल्या सहा महिन्यात १३ वाघ दगावले असल्याची माहिती समोर आली आहे. तर कर्नाटकमध्येही १२ वाघांचा मृत्यू झाला आहे. मात्र महाराष्ट्रात सर्वाधिक वाघ दगावल्यान महाराष्ट्रातल्या व्याघ्र संरक्षण मोहिमेला मोठा धक्का लागला असल्याचे मत प्राणी प्रेमीकडून व्यक्त होत आहेत.