‘‘कोकणी माणसाने मला राजकीय जीवनात बरेच काही दिले. त्याच जनतेने पहिला पराभवही दाखवला. हा पराभव मी मान्य केला आहे. मतदारांचा कौल मी मान्य करतो. माझी कोणतीही तक्रार नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात माझी उणीव युवा आमदार नितेश राणे भरून काढतील. कोकणी माणसाचा ठसा उमटवतील,’’ असा विश्वास माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी कणकवली येथे व्यक्त केला.
कणकवली- ‘‘कोकणी माणसाने मला राजकीय जीवनात बरेच काही दिले. त्याच जनतेने पहिला पराभवही दाखवला. हा पराभव मी मान्य केला आहे. मतदारांचा कौल मी मान्य करतो. माझी कोणतीही तक्रार नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात माझी उणीव युवा आमदार नितेश राणे भरून काढतील. कोकणी माणसाचा ठसा उमटवतील,’’ असा विश्वास माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी कणकवली येथे व्यक्त केला.
महाराष्ट्रात विधानसभेचे निकाल हाती आलेले आहेत. कणकवली, देवगड, वैभववाडी मतदारसंघातून २५ हजार ९७९चे मताधिक्य मिळवून काँग्रेसचे उमेदवार नितेश राणे विजयी झालेले आहेत. त्यांचे अभिनंदन व पुढील वाटचालीस आपण शुभेच्छा देतो. कणकवलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहिर सभा घेऊनही येथील मतदारांनी भाजपचा प्रभाव न जुमानता युवा व अभ्यासू उमेदवार नितेश राणे यांना निवडून दिल्याबद्दल सर्व कार्यकर्ते आणि मतदारांचे मी आभार मानतो. नितेश राणे हे मतदारांचा विश्वास संपादन करतील, असेही यावेळी राणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
कुडाळ-मालवण मतदारसंघातून आपला झालेला पराभव त्यांनी मान्य केला. ते म्हणाले, माझा पराभव मी स्वीकारतो. मतदारांचा कौल मला मान्य आहे. कोकणी माणसांनी राजकारणात मला बरेच काही मिळवून दिले. याच कोकणी माणसाने पहिला पराभव दाखवला. त्याबद्दल माझी कोणतीही तक्रार नाही. नितेश राणे यांचा या निवडणुकीत झालेला विजय अवघ्या महाराष्ट्राच्या राजकारणात उपयुक्त ठरेल. माझा पराभव हा राजकीय वाटचालीचा अस्त आहे. मात्र, त्याची कोणतीही चिंता मला नाही.
या निवडणुकीत निवडून आलेल्या सेनेच्या उमेदवारांचे अभिनंदन आणि त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा, असेही राणे यांनी सांगितले.
जनतेला काय हवे आहे हे मी समजू शकलो नाही. कोकण व सिंधुदुर्गातील जनतेचे जीवन सुखमय व्हावे. विकासात्मक जिल्हा घडवावा, कोकण नावारूपास यावे यासाठी गेली २५ वर्षे मी केलेल्या कामाची परतफेड माझ्या पराभवाने मिळाली. महाराष्ट्राच्या राजकारणात काहीतरी गमावले असे जनतेला माझ्या पराभवाने नक्कीच वाटेल, असेही ते म्हणाले. या पराभवाचे दु:ख, हुरहूर मनात नाही. मी जे काम आणि कार्य केले त्या कामाची कोणीही बरोबरी करू शकणार नाही. माझ्या कामाचा ठसा कोणीही पुसू शकणार नाही. विधानसभेतील कामगिरी आणि महाराष्ट्राच्या विकासातील माझे योगदान महाराष्ट्र नेहमीच स्मरणात ठेवेल. कोकणी माणसाने माझ्या आयुष्यात यश दिले. मात्र, या पुढील महाराष्ट्रातील राजकारणात नितेश राणे माझी उणीव भरून काढतील, असा मला विश्वास वाटतो, असे भावपूर्ण प्रतिपादन त्यांनी केले.
पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना नारायण राणे म्हणाले, पराभव किती मतांनी झाला हे महत्त्वाचे नाही. पराभव हा पराभवच असतो. या मतदारांनी विरोधात मते दिली. त्यांना माझ्यापेक्षा प्रतिस्पर्धी उमेदवार प्रभावी आणि जास्त लोकहित करणारा वाटला असेल म्हणून त्यांनी ती मते दिली. त्यामुळे पराभवात किती मतांचा फरक आहे. यावर मी विश्लेषण करणार नाही. या निवडणुकीत मला मतदारांनी थांबवले आहे. त्यामुळे पुढील राजकीय वाटचालीसंदर्भात आपण विचारपूर्वक निर्णय घेऊ, असे एका प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले. कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी या तिन्ही मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत आणि मतदारांनी काँग्रेसला मतदान केल्याबद्दलही राणे यांनी सर्वाचे आभार मानले.
[EPSB]
होय, माझा पराभव झाला!
हा पराभव मी स्वीकारला असून ज्या कोकणी माणसाने यापूर्वी भरभरून मते दिली. अनेक उच्चपदेही त्यांच्यामुळे मिळाली. त्यांनीच आज पराभूत केल्यावर त्यांच्यावर मी नाराज वा दु:खी नाही.
माझ्या जन्मभूमीतच माझा पराभव!
लोकसभा निवडणुकीतील पराभवाच्या पार्श्वभूमीवर कोकणाच्या विकासाच्या मॉडेलचा, कोकणाच्या परिवर्तनाच्या विचाराचा ऊहापोह हे या लेखाचे प्रयोजन आहे.
[/EPSB]