बंगालवर ३५५ धावांनी मोठी मिळवत मध्य प्रदेशने रणजी करंडक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत त्यांची गाठ माजी विजेता मुंबईशी पडेल.
मुंबई – बंगालवर ३५५ धावांनी मोठी मिळवत मध्य प्रदेशने रणजी करंडक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत त्यांची गाठ माजी विजेता मुंबईशी पडेल.
मध्य प्रदेशच्या ७८८ धावांच्या मोठय़ा आव्हानाचा पाठलाग करताना बंगालने चांगली चुरस दिली. मात्र पराभव टाळण्यात त्यांना अपयश आले. ३ बाद ११३ वरून पुढे खेळताना बंगालचा दुसरा डाव दुस-या सत्रात ४३२ धावांवर आटोपला. मनोज तिवारीसह (१२४) पंकज शॉची (११८) शतके तसेच तळातील अशोक डिंडाच्या (५२) झटपट अर्धशतकाच्या जोरावर त्यांना चारशेपार मज मारता आली.
मध्य प्रदेशतर्फे मध्यमगती गोलंदाज ईश्वर पांडेने ४ तसेच नवोदित मध्यमगती गोलंदाज चंद्रकांत सकुरेने ३ विकेट घेत विजयात मोलाचे योगदान दिले. सामन्यात आठ विकेट घेणा-या ईश्वरला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. गेल्या ९ सामन्यांत मध्य प्रदेशने बंगालवर दुसरा निर्णायक विजय नोंदवला. उपांत्यपूर्व फेरीतील चारही लढती निर्णायक ठरल्या. मात्र मध्य प्रदेश वि. बंगाल वगळता अन्य तीन लढतीत चार दिवसांच्या आत आटोपल्या. सौराष्ट्राने विदर्भला तीन दिवसांतच डावाने हरवले. उपांत्य फेरीतील दुस-या लढतीत कटकमध्ये मध्य प्रदेशसमोर मुंबईचे आव्हान आहे. पहिल्या लढतीत आसामसमोर सौराष्ट्र आहे.