काही लोकांचे सर्वेक्षण करून लोकसभा निवडणुकीच्या निकालांचे भाकित करता येणार नाही, असे सांगत काँग्रेसने सर्व मतदानोत्तर चाचण्यांचे अंदाज फेटाळले आहेत.
नवी दिल्ली- मतदानानंतर काही लाख लोकांचे सर्वेक्षण करून लोकसभा निवडणुकीच्या निकालांचे भाकित करता येणार नाही, असे सांगत काँग्रेसने मंगळवारी सर्व मतदानोत्तर चाचण्यांचे अंदाज फेटाळले.
देशात ८१ कोटी मतदार असताना केवळ काही लाख लोकांच्या चाचण्यांवर लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा अंदाज बांधता येणार नाही. १६ मेपर्यंत वाट पाहा, असे काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी ट्विटरवर सांगितले.
काँग्रेसचे सरचिटणीस शकिल अहमद यांनीही सर्व मतदानोत्तर चाचण्यांचे अंदाज फेटाळून लावले. २००४ आणि २००९ मध्ये झालेल्या निवडणुकीच्या वेळी सर्व अंदाज काँग्रेसने चुकीचे ठरवले होते आणि येत्या १६ तारखेच्या निकालाची काँग्रेस वाट पाहात आहे, असे अहमद म्हणाले.
दरम्यान, विविध वृत्तवाहिन्यांनी सोमवारी घेतलेल्या मतदानोत्तर चाचण्यांच्या कार्यक्रमात काँग्रेसने सहभाग घेतला नव्हता.
In a Country of 800 Million Voters how can few Lakhs sample size surveys predict the result ? Let’s wait for 16 th May.
— digvijaya singh (@digvijaya_28)