भाजप नेते आणि केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांचे अपघाती निधन झाले असले तरी, यामागे घातपात असल्याचा बीडमधील जनतेला संशय आहे.
बीड – भाजप नेते आणि केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांचे अपघाती निधन झाले असले तरी, यामागे घातपात असल्याचा बीडमधील जनतेला संशय आहे.
त्यामुळेच गोपीनाथ मुंडे यांच्या अंत्यसंस्कारासाठी परळीमध्ये आलेल्या नेत्यांच्या गाडयांना बीडच्या जनतेने घेराव घालत सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आर.आर.पाटील, जयंत पाटील यांच्या गाडयांना घेराव घालत संतप्त जनतेने मुंडे यांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची गाडी जमावाने गाडी अडवून धरत धक्काबुकी केली. काही नेत्यांच्या गाडीवर दगडफेकही करण्यात आली.