किश्तवाड हिंसाचार, जमीन गैरव्यवहार आणि तेलंगण प्रकरणी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये मंगळवारीही विरोधकांनी गोंधळ घातला.
नवी दिल्ली- किश्तवाडमध्ये उसळलेला जातीय हिंसाचार तसेच हरयाणामधील जमीन गैरव्यवहारप्रकरणी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये मंगळवारीही विरोधकांनी गोंधळ घातला. या मुद्द्यावर लोकसभा तसेच राज्यसभेत विरोधक आणि सत्ताधारी आमनेसामने आल्याने कामकाज सुरुवातीला १२ वाजेपर्यंत आणि नंतर दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.
राज्यसभेत कामकाज चालू होताच भाजप सदस्यांनी वधरा यांच्या जमीन व्यवहारासंदर्भात जोरदार घोषणाबाजी करत प्रश्नोत्तराचा तास बंद पाडला. त्यानंतर भाजपचे खासदार आदित्यनाथ त्यागी यांनी हिंदू धार्मिक स्थळांना लक्ष्य केले जात असल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर गोंधळ झाल्याने सभापती हमीद अन्सारी यांनी गदारोळ करणा-या खासदारांना दम दिला. मात्र गोंधळ सुरुच होता. त्यातच भाजपसह तेलगु देसम पक्षाच्या (टीडीपी) खासदारांनीही तेलंगण राज्य निर्मितीच्या निर्णयास विरोध दर्शविताना आंध्र प्रदेश वाचविण्याच्या घोषणा दिल्या. या गोंधळातच सभापती हमीद अन्सारी यांनी कामकाज तहकूब केले.
तर लोकसभेत किश्तवाड प्रकरण आणि त्यानंतर हरयाणामधील जमीन गैरव्यवहार प्रकरणात रॉबर्ट वधरा यांचा हात असल्याचे आरोप होताच विरोधक आणि सत्ताधारी यांनी समोरासमोर येऊन गोंधळ घातला.
[EPSB]
संसदेत गोंधळ, कामकाज तहकूब
संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये विरोधकांनी सोमवारी गोंधळ घातल्याने कामकाज दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.
[/EPSB]