अन्न सुरक्षा विधेयकानंतर केंद्रातील संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारला भूसंपादन विधेयक मंजूर करुन घेण्यात यश आले आहे.
नवी दिल्ली- अन्न सुरक्षा विधेयकानंतर केंद्रातील संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारला भूसंपादन विधेयक मंजूर करुन घेण्यात यश आले आहे. लोकसभेने गुरुवारी हे विधेयक मंजूर केले. या विधेयकावर दिवसभर चर्चेनंतर झालेल्या मतदानात विधेयकाच्या बाजूने २१६ तर विरोधात १९ मते पडली. चर्चा दरम्यान या विधेयकातील १५८ दुरुस्त्या मंजूर करण्यात आल्या.
अन्न सुरक्षा विधेयका प्रमाणेच भूसंपादन विधेयक देखील सरकारसाठी महत्त्वाचे होते. या विधेयकावरील चर्चासाठी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी हे उपस्थित होते. विधेयक मंजूर झाल्याबद्दल राहुल गांधी यांना समाधान व्यक्त केले.
सध्या अस्तित्वात असलेले भूसंपादन विधेयक हे १८९४ सालचे आहे. लोकसभेनंतर हे विधेयक राज्य सभेत सादर केले जाईल.