विश्वचषक स्पर्धेत येत्या १५ फेब्रुवारीला गाबा स्टेडियमवर भारत-पाकिस्तानचे संघ जेव्हा आमने-सामने येतील तेव्हा या बहुप्रतिक्षित लढतीचे आणखी एक आकर्षण असेल ते म्हणजे हिंदी सिनेसृष्टीचे सुपरस्टार अमिताभ बच्चन.
मुंबई – विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत-पाकिस्तानचे संघ जेव्हा आमने-सामने येतात तेव्हा ती लढत फक्त क्रिकेटचा एक सामना नसतो. त्यात जिंकण्याची ईषा, ठसन भावनिकता असे सर्व रंग त्या सामन्यामध्ये भरलेले असतात.
विश्वचषक स्पर्धेत येत्या १५ फेब्रुवारीला गाबा स्टेडियमवर भारत-पाकिस्तानचे संघ जेव्हा आमने-सामने येतील तेव्हा या बहुप्रतिक्षित लढतीचे आणखी एक आकर्षण असेल ते म्हणजे हिंदी सिनेसृष्टीचे सुपरस्टार अमिताभ बच्चन.
अमिताभ गाबाच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये भारताचा माजी कर्णधार कपिल देव आणि प्रसिध्द समालोचक हर्ष भोगले यांच्यासह भारत-पाकिस्तान सामन्याचे समालोचन करताना दिसणार आहेत. अमिताभ या समालोचनाव्दारे शमिताभ या आपल्या आगामी चित्रपटाची प्रसिध्दी करणार आहेत.
भारत-पाकिस्तान सामना आणि त्यात अमिताभ यांचे समालोचन हा दुर्मिळ योगायोग दोन्ही देशांच्या क्रिकटे चाहते आणि प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. भारत-पाकिस्तानच्या क्रिकेट चाहत्यांमध्ये कितीही ठसन असली तरी, अमिताभ या एका नावावर मात्र त्यांच्यात एकमत असेल.
कारण अमिताभ यांचा भारता बरोबर पाकिस्तानातही चाहतावर्ग आहे. अमिताभ स्वत:हा क्रिकेटवेडे असून, २०११ मध्ये भारताने विश्वविजेतेपद मिळवल्यानंतर अमिताभ यांनी स्वत:हा रस्त्यावर उतरुन टीम इंडियाच्या विश्वविजेतेपदाचा जल्लोष साजरा केला होता.