देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक केलेल्या कन्हैया कुमारची सुटका झाली असून त्याने जेएनयूमध्ये शुक्रवारी मोदी सरकारवर सडकून टीका केली.
नवी दिल्ली- देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक केलेल्या कन्हैया कुमारची सुटका झाली असून त्याने जेएनयूमध्ये शुक्रवारी मोदी सरकारवर सडकून टीका केली.
देशाविरोधी घोषणा दिल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या कन्हैया कुमारची गुरुवारी सकाळी तिहार तुरुंगातून सुटका झाली.
जवाहरलाल नेहरु विद्यापीठात त्याचे जल्लोषात स्वागत झाले. त्यानंतर त्याने विद्यापीठात भाषणही केले. यावेळी त्याने मोदी सरकारवर सडकून टीका केली.
सुटकेचा जल्लोष (फोटोगॅलरी)
‘भारतापासून नाही तर भारतात स्वातंत्र्य मागत आहोत, भूक, भ्रष्टाचार, भेदभाव आणि मागासलेपणापासून मुक्ती..’ अशा घोषणा देत त्याने भाषणाला सुरूवात केली.
‘मी एका गावातून आलेला सामान्य विद्यार्थी आहे. तिथे अनेकदा जादूचे खेळ होतात. हे जादूगार लोकांना अंगठ्या विकतात आणि त्यांची इच्छा पूर्ण होईल, असे सांगतात. असेच काही लोक आपल्या देशातही आहेत. ते आम्ही काळा पैसा परत आणू, सबका साथ सबका विकास, अशा बतावण्या मारतात. आपण भारतीय लोक अशा बतावण्या विसरूनही जातो. पण यावेळचा हा तमाशा मोठा आहे आणि तो विसरण्यासारखा नाही,’ अशा शब्दांत कन्हैयाने मोदी सरकारवर सडकून टीका केली.
कन्हैया कुमारला बुधवारी दिल्ली उच्च न्यायालयाने १० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सहा महिन्यांसाठी अंतरिम जामीन मंजूर केला. तसेच देशविरोधी कृत्यांपासून दूर राहण्याची ताकीदही त्याला देण्यात आली आहे.
नऊ फेब्रुवारीला जेएनयूच्या परिसरात अफजल गुरूच्या समर्थनात कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात देशविरोधात घोषणा दिल्याचा आरोप कन्हैयावर आहे.
[EPSB]
कन्हैया कुमारचा जामीन मंजूर
देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या कन्हैया कुमारला दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी जामीन मंजूर केला.
‘जेएनयू’तील विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष अटकेत
संसद हल्ल्याचा मास्टरमाईंड अफजल गुरू याला फाशी दिल्याच्या निषेधार्थ जवाहरलाल नेहरू विद्यापीठात देशविरोधी घोषणा देणा-या जेएनयू विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हेय्या कुमारला पोलिसांनी अटक केली आहे.
[/EPSB]