बिहार विधानसभा निवडणुकीचे आता फक्त दोन टप्पे बाकी राहिले असून, विकासाच्या मुद्यावरुन सुरु झालेला प्रचार तंत्र-मंत्र, पिशाच्च या व्यक्तीगत पातळीपर्यंत घसरला आहे.
मोतीहारी – बिहार विधानसभा निवडणुकीचे आता फक्त दोन टप्पे बाकी राहिले असून, विकासाच्या मुद्यावरुन सुरु झालेला प्रचार तंत्र-मंत्र, पिशाच्च या व्यक्तीगत पातळीपर्यंत घसरला आहे.
जास्तीत जास्त मतदान आपल्या बाजूने वळवण्यासाठी नेते बिहारचा डीएनए, यदूवंश असे बिहारच्या अस्मितेचे मुद्दे उपस्थित करुन मतदारांच्या भावनिकतेला आवाहन करत आहेत.
भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी रक्सॉल येथील सभेमध्ये बिहार निवडणुकीतील विजयाचा संबंध थेट पाकिस्तानशी जोडला.
बिहार निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा पराभव झाला तर, फटाके पाकिस्तानात फुटतील तिथे आंनदोत्सव साजरा होईल. तुम्हाला हे हवे आहे का ? असा सवाल त्यांनी जमलेल्या गर्दीला विचारला.
बिहार विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता सीमांचलकडे सरकला आहे. सीमांचलमध्ये मुस्लिम मतदार मोठया संख्येने आहेत. त्यामुळे येथे जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा भाजपा आघाडीचा प्रयत्न आहे. त्यातूनच शहा यांनी बिहारच्या विजयाचा संबंध पाकिस्तानशी जोडला. पाचव्या टप्प्यात ५७ जागांवर मतदान होणार असून, या टप्प्यात जी आघाडी जास्तीत जास्त जागा जिंकेल त्यांना पुढची पाचवर्ष बिहारमध्ये राज्य करता येईल.