बीसीसीआयवर क्रीडा मंत्रालयाचे नियंत्रण ठेवण्यासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी क्रीडा मंत्रालय, बीसीसीआयला नोटीस पाठवली आहे.
नवी दिल्ली- भारतीय क्रिकेट नियामक मंडळावर क्रीडा मंत्रालयाचे नियंत्रण ठेवण्यासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी क्रीडा मंत्रालय, बीसीसीआयला नोटीस पाठवली आहे.
आयपीएलमधील स्पॉटफिक्सिंग प्रकरणानंतर बीसीसीआयवर नियंत्रण ठेवण्याची मागणी जोर धरू लागली आहे. यासंदर्भात दिल्ली उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. क्रीडा मंत्रालयाने बीसीसीआयच्या सर्व बाबतीत नियंत्रण ठेवावे असे याचिकेत म्हटले आहे. यावर उत्तर देण्यासाठी न्यायालयाने क्रीडा मंत्रालय, बीसीसीआय आणि दिल्ली सरकारला १४ ऑगस्टपर्यंतची मुदत दिली आहे.
आयपीएलमधील स्पॉटफिक्सिंगमुळे बीसीसीआयचे विश्वास गमवला असल्याचे याचिकेत म्हटले आहे.
[poll id=”285″]