देशाचे लक्ष लागून राहिलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत पाचव्या व अंतिम टप्प्यातील मतदान गुरुवारी झाले.
पटना- देशाचे लक्ष लागून राहिलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत पाचव्या व अंतिम टप्प्यातील मतदान गुरुवारी झाले.
पाचव्या टप्प्यात ५९.४६ टक्के मतदान झाले. शेवटच्या टप्प्यात ५७ जागांसाठी मतदान झाले. मतदानासाठी सकाळपासून मतदारांमध्ये उत्साह दिसून आला.
मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदार सकाळीच घराबाहेर पडले होते. अनेक ठिकाणी मतदानासाठी मतदारांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.
काही ठिकाणी ईव्हीएम मशिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मतदान प्रक्रिया काही काळ ठप्प झाली होती.