देशात सध्या महिलांवरील अत्याचार, विनयभंग, महिलांचे खून अशा अंगावर शहारे आणणा-या घटनांना ऊत आला आहे. अल्पवयीन मुलींपासून तो वयस्कर महिलेपर्यंत, शहरापासून तो ग्रामीण भागापर्यंत सर्वत्र होणा-या या बलात्काराच्या या घटनांमधे अल्पवयीन मुलांपासून तो ७५ वर्षाच्या वृद्धापर्यंत आणि गुंडांपासून तो वर्दीतील पोलिसांपर्यंत विकृत लोकांचा समावेश असल्याने अशा घटनांनी देशातील जनता संतप्त व हैराण झाली आहे.
लोकांना आपल्या मुलीबाळींविषयी काळजी वाटत आहे. एखादी आजाराची साथ यावी त्याप्रमाणे ही बलात्कारांची साथ इतकी बोकाळली आहे की, स्वत:ला आध्यात्मिक गुरू म्हणवून घेणारे आसाराम बापू यांच्यावरही एका अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप असून अटक टाळण्यासाठी ते प्रयत्न करत होते. मात्र, आसाराम बापूंना शनिवारी रात्री पोलिसांनी इंदूर येथे अटक केली. त्यामुळे गेला आठवडाभर सुरू असलेल्या अटकनाटय़ावर पडदा पडला. अल्पवयीन मुलीने बापूंवर त्यांनी जोधपूर येथील आश्रमात आपले लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप केला. यानंतर जोधपूर पोलिसांनी आसाराम बापूंना आपले म्हणणे मांडण्यासाठी चार दिवसात पोलिस ठाण्यात हजर होण्यासाठी समन्स काढले. पण या आध्यात्मिक संताने या समन्सला दाद दिली नाही. पोलिस आश्रमात गेले तेव्हा त्यांच्या समर्थकांनी बापू ध्यानाला बसले आहेत, असे सांगून पोलिसांना तब्बल सहा तास ताटकळत ठेवले. सहा तासानंतर पोलिसांनी आपले काम आटोपले. आसाराम बापूंनी पोलिस ठाण्यात हजर होण्यास टाळाटाळ केली. आपण आजारी आहोत, बरे वाटल्यावर आपण आपले म्हणणे मांडू, असे ते म्हणू लागले. अटक टाळण्याचा प्रयत्न करू लागले. अखेर ते अटक टाळण्यासाठी इंदूरला पसार झाले. पण त्यांच्या मागावर असलेल्या पोलिसांनी इंदूर गाठले. तेथेही आसाराम बापूंच्या भक्तांनी एकच गर्दी करून पोलिसांना रोखण्याचा प्रयत्न केला. तसेच या भक्तांनी पत्रकारांवर हल्ले करून त्यांना मारहाण केली व त्यांचे कॅमेरे फोडले. अर्थात पोलिसांनी त्यांचा विरोध मोडून काढून या ‘संता’ला अटक केली व कायदा अशा बापूंनाही सारखाच असतो, हे दाखवून दिले. आसाराम बापू हे गेले काही काळ वादग्रस्त घटनांमुळे चच्रेत राहिले आहेत. त्यांच्या गुजरातमधील आश्रमात दोघा अल्पवयीन मुलांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. ते प्रकरणाचा तपास अजूनही पूर्ण झालेला नाही. दिल्लीतील बलात्कारित मुलीने तिच्यावर सामूहिक बलात्कार करणा-यांना भाऊ म्हणून मारायला हवी होती, त्यामुळे त्यांचे हृदयपरिवर्तन झाले असते, अशी बालिश आणि संताप आणणारी विधाने केली. महाराष्ट्र दुष्काळाने होरपळलेला असताना त्यांनी कहरच केला. नागपूर आणि नवी मुंबई येथे होळीच्या दिवशी हजारो लीटर पाण्याची नासाडी करून भक्तांना समाधान दिले आणि लोकांच्या रोषाचे धनी झाले. त्यावेळी या बापूच्या चेल्यांनी दंगामस्ती केली व शक्तिप्रदर्शन केले. आता तर बापूंवर लैंगिक शोषणाचा आरोप झाला आहे. हा आरोप झाल्यानंतर वास्तविक आसाराम बापूंनी आपण निर्दोष आहोत, हे सिद्ध करण्यासाठी पोलिसांना सहकार्य करायला हवी होते. पण ते करण्याऐवजी त्यांनी कांगावा करण्यास प्रारंभ केला. आरोप करणा-या मुलीचे मानसिक संतुलन ढळल्याचा आरोप केला. तसेच आपल्यावरील आरोपांमागे काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी असल्याचा जावईशोध लावला. या त्यांच्या आरोपाने त्यांचे हसे झाले, ही गोष्ट वेगळी. देशात सध्या बलात्कार व विनयभंगांचे प्रकार इतके वाढले आहेत की, आज देशात दिवसाला एकतरी बलात्काराची घटना घडत असते. दिल्लीतील बलात्काराच्या घटनेनंतर देशात प्रक्षोभ झाला आणि बलात्का-यांविरुद्ध कठोर कारवाई आणि कायदे करण्याची मागणी महिलांनी केली. परिणामी सरकारने कायद्यात बदलही केले. त्यानंतर मुंबईत प्रसारमाध्यमाच्या एका महिला छायाचित्रकारावर सामूहिक बलात्कार झाला आणि त्याचे पडसाद मुंबईसह देशभर उठले. महिलांवरील अत्याचारांचे हे सत्र वाढत्या प्रमाणात सुरू आहे, ही खरोखर चिंताजनक आणि भयावह बाब आहे. लोकांच्या संरक्षणाची जबाबदारी असलेल्या पोलिस दलातील पोलिसही अशा अत्याचारात सामील होतात तेव्हा डोके सुन्न होण्याची वेळ येते. आज जे काही घडत आहे त्याची दखल केवळ सरकार व कायद्याची अंमलबजावणी करणा-या यंत्रणांनी घेऊन उपयोगी नाही तर समाजशास्त्रज्ञ, सामाजिक कार्यकत्रे, महिला संघटना, मानसशास्त्रज्ञ आदी समाजाच्या भल्याचा विचार करणा-या सर्वानीच केला पाहिजे. शनिवारी महिलांविरोधी अत्याचारांद्दल जनजागृती करण्यासाठी अहिंसा संदेश योजना सुरू करण्यात आली. या कार्यकमात बोलताना काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी सांगितले की, देशात महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना केवळ कडक कायदे करून उपयोगी नाही तर त्यांची कडक अंमलबजावणीही व्हायला हवी. देशामध्ये महिलांसाठी सुरक्षित व भीतीमुक्त वातावारण निर्माण केले पाहिजे. महिलांच्या सबलीकरणासाठी सामाजिक आंदोलने झाली पाहिजेत. समाजातील प्रतिगामी विचार, सामाजिक मानसिकता बदलणे आवश्यक आहे. सोनिया गांधी म्हणतात ते बरोबरच आहे. समाजाची मानसिकता बदलणे आवश्यक आहे. महिलांविषयी पुरुषांमध्ये आदराची भावना निर्माण झाल्याशिवाय महिला भयमुक्त होणार नाही. आज चित्रपटांमध्ये आणि वाहिन्यांवरील मालिकांमध्ये स्त्रीचे जे चित्रण केले जात आहे त्यावरून स्त्री ही दुर्बल आहे, ती पुरुषाच्या मर्जीवर अवलंबून आहे, असा संदेश जात आहे व तो थांबवण्यात आला पाहिजे. ती आíथकदृष्टय़ा जशी सबल झाली पाहिजे त्याचप्रमाणे तिला स्वसंरक्षणाचे धडेही मिळाले पाहिजेत. पण, त्याचबरोबर बुवाबाजी, बाबागिरी, बापूगिरी करून लोकांना मानसिक गुलाम बनवणा-या, त्यांचे मानसिक शोषण करणा-या आसाराम बापूंसारख्या तथाकथित बुवांना, बापूंना, बापूंना आणि गुंडगिरी करणा-या त्यांच्या चेल्यांना जरब बसावी, यासाठीही सरकारने मोहीम उघडली पाहिजे. बाबांच्या, बापूंच्या बारा ठिकाणी बारा भानगडी असतात. अशा भानगडी उघडकीलाही येतात, पण त्यांच्यावर कारवाई होताना दिसत नाही. प्रकरण उघडकीला आल्यानंतरही राजकीय आश्रय मिळवून बाबा, बापू बाहेरच राहतो. राजकारण्यांनाही बापूच्या हजारो भक्तांचा पाठिंबा निवडणुका जिंकण्यासाठी हवा असतो. त्यामुळे ‘एकमेका साहाय्य करू..’ अशी भूमिका घेत या बारा भानगडी सुरूच राहतात. महाराष्ट्राने नुकतीच जादूटोणाविरोधी कायद्याला मान्यता दिलेली आहे. त्यामुळे या कायद्याची अंमलबजावणीही बारा भानगडी करणा-या बापूंना, बाबांना आणि विवेकहीन चेल्यांच्या गुंडगिरीला आळा घालण्यासाठी जोरकसपणे केला पाहिजे.
[EPSB]
दहशतवादविरोधी मोहिमेला गती हवी
अनेक बॉम्बस्फोटांबाबत हवा असलेला, गेले काही दिवस पोलिसांना सतत गुंगारा देत असलेला ‘इंडियन मुजाहिदीन’ या दहशतवादी संघटनेचा संस्थापक आणि म्होरक्या यासीन भटकळ याच्या, त्याचा सहकारी असदुल्लाह अख्तर ऊर्फ हड्डी याच्यासह बुधवारी रात्री नेपाळ सीमेवर मुसक्या बांधण्यात आल्या.
[/EPSB]