वर्धा जिल्ह्यातील अमरावती-नागपूर महामार्गावर तळेगावजवळ गुरुवारी पहाटे एका खासगी बसने पेट घेतल्याने पाच प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला.
वर्धा- वर्धा जिल्ह्यातील अमरावती-नागपूर महामार्गावर तळेगावजवळ गुरुवारी पहाटे एका खासगी बसने पेट घेतल्याने पाच प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. तर १५ हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या करंजा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
जळगावहून नागपूरकडे येत असताना महामार्गावरील सत्याग्रही घाटात पहाटे प्रवासी झोपेत असताना या बसने अचानक पेट घेतला. अपघाताचे नेमके कारण समजू शकले नाही.