१४ जानेवारी २०१५ रोजी महिलांच्या सबलीकरणासाठी ‘प्रहार स्त्री प्रेरणा’ची स्थापना झाली. स्वयंरोजगार, स्वयंविकास आणि स्वसंरक्षण या त्रिसूत्रीवर ‘प्रहार स्त्री प्रेरणा’चे आतापर्यंतचे कार्य चालले.
मुंबई – १४ जानेवारी २०१५ रोजी महिलांच्या सबलीकरणासाठी ‘प्रहार स्त्री प्रेरणा’ची स्थापना झाली. स्वयंरोजगार, स्वयंविकास आणि स्वसंरक्षण या त्रिसूत्रीवर ‘प्रहार स्त्री प्रेरणा’चे आतापर्यंतचे कार्य चालले.
या त्रिसूत्रीवर भर देत महिलांकरता विविध कार्यक्रम राबवण्याचा ‘प्रहार स्त्री प्रेरणा’चा प्रयत्न आहे. त्यालाच अनुसरून महिलांना स्वत:च्या पायावर सक्षमपणे उभे राहता यावे, रोजगाराच्या निरनिराळय़ा संधी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने अनेक कार्यक्रम राबवण्यात आले.
याआधी १४ फेब्रुवारीला बचत गटाच्या माध्यमातून स्त्रियांना उत्पन्नाचे साधन मिळवून देण्यासाठी आहुजा हॉल, दादर येथे बचत गटाविषयी माहिती देणा-या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास महिला मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या. महागाईमुळे दिवसेंदिवस खर्चाचा ताळमेळ घालणे कठीण होत आहे.
याचसाठी व्यवसाय प्रशिक्षण घेऊन रोजगाराच्या नवीन संधी महिलांना उपलब्ध करून देण्यासाठी येत्या १३ एप्रिल रोजी ‘प्रहार स्त्री प्रेरणा’च्या वतीने ‘बचतीचा वटवृक्ष, सुखाचे होईल आयुष्य’ या शीर्षकाअंतर्गत, विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. एल. के. हायस्कूल, मुक्तादेवी मंदिर रोड, चुनाभट्टी पूर्व इथे हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. चुनाभट्टी स्त्री प्रेरणा शाखेच्या प्रमुख प्रमिला गोस्वामी यांचे विशेष सहकार्य या कार्यक्रमास आहे.
या उपक्रमास सरकारचे मान्यवर अधिकारी तसेच कार्यकर्ते मार्गदर्शन करणार आहेत. महिलांच्या बचत गटासाठी, सरकारच्या कोणकोणत्या योजना आहेत, त्याअंतर्गत त्यात कोणते प्रशिक्षण दिले जाते, ते प्रशिक्षण कुठे मिळते, त्यासाठीचे अनुदान कसे मिळवावे, अशा विविध विषयांची सविस्तर माहिती या उपक्रमात दिली जाणार आहे. तरी महिलांनी या संधीचा लाभ घेत, स्वयंरोजगाराची कास धरत स्वत:चा उत्कर्ष साधावा.